शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा बळी का?”: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 14:19 IST

Maharashtra Political Crisis: चंद्रकांत पाटील हे अमित शाहांच्या जवळचे आहेत. मागील सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर गेल्या जवळपास १० दिवसांत राज्याच्या सत्ता संघर्षात अनेकविध घटना घडलेल्या पाहायला मिळाले. भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत राजकीय वर्तुळाला पुन्हा अचंबित केले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शपथविधी झाल्यानंतर अनेक नेत्यांच्या या नव्या सरकारसंदर्भात प्रतिक्रिया आल्या आहेत. यातच आता वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत एक प्रश्न उपस्थित केला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील. मी मंत्रिमंडळाचा भाग नसेन. पण एकनाथ शिंदे यांना सर्वतोपरी मदत करेन, असे म्हटले होते. मात्र, काहीच वेळात भाजपच्या दिल्लीतील पक्षनेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी पक्षादेश काढला. यानंतर देवेंद्र फडणवीस काहीसे नाराज दिसले. मात्र, पक्षादेश मान्य करून ते शपथबद्ध झाले. हा राजकीय वर्तुळासाठी मोठा धक्का होता. यावरूनही अनेक प्रतिक्रिया देण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट केले आहे. 

देवेंद्र फडणवीसांचा बळी का?

चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले. एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का? अशी विचारणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हे जेवढे धक्कादायक त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास दिल्लीच्या नेतृत्वाने भाग पाडले हे अधिक धक्कादायक आहे. ज्यांनी पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले, आता अडीच वर्षे ते विरोधी पक्षनेते होते, त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले, भाजपाच्या वरिष्ठांचा व नागपूरचा हा आदेश असावा आणि नागपूचा आदेश म्हटले की तो तंतोतंत पाळावा लागतो. नागपूरचा आदेश मोडता येत नाही आणि सत्तेत जाण्याची संधी मिळाली तर, ती स्वीकारायची असते, याचे उदाहरण म्हणजे फडणवीस होय, असा टोला शरद पवार यांनी लगावला. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे