शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा बळी का?”: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 14:19 IST

Maharashtra Political Crisis: चंद्रकांत पाटील हे अमित शाहांच्या जवळचे आहेत. मागील सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर गेल्या जवळपास १० दिवसांत राज्याच्या सत्ता संघर्षात अनेकविध घटना घडलेल्या पाहायला मिळाले. भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत राजकीय वर्तुळाला पुन्हा अचंबित केले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शपथविधी झाल्यानंतर अनेक नेत्यांच्या या नव्या सरकारसंदर्भात प्रतिक्रिया आल्या आहेत. यातच आता वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत एक प्रश्न उपस्थित केला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील. मी मंत्रिमंडळाचा भाग नसेन. पण एकनाथ शिंदे यांना सर्वतोपरी मदत करेन, असे म्हटले होते. मात्र, काहीच वेळात भाजपच्या दिल्लीतील पक्षनेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी पक्षादेश काढला. यानंतर देवेंद्र फडणवीस काहीसे नाराज दिसले. मात्र, पक्षादेश मान्य करून ते शपथबद्ध झाले. हा राजकीय वर्तुळासाठी मोठा धक्का होता. यावरूनही अनेक प्रतिक्रिया देण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट केले आहे. 

देवेंद्र फडणवीसांचा बळी का?

चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले. एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का? अशी विचारणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हे जेवढे धक्कादायक त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास दिल्लीच्या नेतृत्वाने भाग पाडले हे अधिक धक्कादायक आहे. ज्यांनी पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले, आता अडीच वर्षे ते विरोधी पक्षनेते होते, त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले, भाजपाच्या वरिष्ठांचा व नागपूरचा हा आदेश असावा आणि नागपूचा आदेश म्हटले की तो तंतोतंत पाळावा लागतो. नागपूरचा आदेश मोडता येत नाही आणि सत्तेत जाण्याची संधी मिळाली तर, ती स्वीकारायची असते, याचे उदाहरण म्हणजे फडणवीस होय, असा टोला शरद पवार यांनी लगावला. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे