शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Budget 2020: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात नवीन काहीच नाही: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 12:46 IST

उलट लोकांची भीती वाढवण्याचा प्रयत्न केला गेला आहे

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात नवीन काहीच नसून, अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना त्यामधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सरकारने काढला नाही. अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र 'बजेट' असावे, मात्र एससी आणि ओबीसीचे एकत्र 'बजेट' सादर करून या समुहाचे हक्क नाकरण्याचे काम करण्यात आले असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

तर या अर्थसंकल्पात नवीन काहीच नाही. लोकांना अपेक्षा होत्या की अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी प्रयत्न होईल. प्रत्यक्षात मात्र असे होताना दिसलेले नाही. उलट लोकांची भीती वाढवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. भीतीमुळे लोकं खरेदी करत नाही आणि त्यामुळे महसूल उत्पन वाढत नसल्याचे आरोप सुद्धा आंबेडकर यांनी केला आहे.