शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

Maharashtra Politics: “...तर राहुल गांधी हे PM मोदींच्या पाठीशी उभे राहतील, २०२४ भाजपचा सत्तेचा शेवटचा कालखंड”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 09:52 IST

Maharashtra Politics: २०२४ हा भाजपसाठी सत्तेचा शेवटचा कालखंड असेल, असा दावा करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: एकीकडे राज्यासह देशातील राजकीय वातावरण तापलेले असताना, दुसरीकडे सर्वच पक्ष आता २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहेत. यामध्ये भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असून, यानिमित्ताने पुन्हा एकदा पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच २०२४ हा भाजपचा सत्तेचा शेवटचा कालखंड असेल.उद्या जर पंतप्रझान मोदी यांनी राहुल गांधी यांना माझ्यामागे उभे राहा असे सांगितले तर राहुल गांधी त्यांच्यामागे उभे राहतील, असा मोठा दावा करण्यात आला आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हा मोठा दावा केला आहे. राहुल गांधी तुम्ही माझ्या मागे उभे राहा. नाही तर तुरुंगाच टाकेल, असे पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी यांना म्हटले तर उद्या राहुल गांधी मोदींच्या मागे उभे राहतील. कारण त्यांनी व्यवस्थाच तशी केली आहे, माझ्या मागे उभे रहा, नाहीतर जेलमध्ये जा, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. इथले लढे राजकीय लोक लढतील, असे समजू नका. हा लढा आपल्यालाच लढावा लागेल, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

२०२४ हा भाजपसाठी सत्तेचा शेवटचा कालखंड असेल

२०२४ हा भाजपसाठी सत्तेचा शेवटचा कालखंड असेल. मोदी विरोधी बाकावर जातील, यासाठी आताच कामाला लागा. आम्ही मोहन भागवत यांना विचारतो की, तुम्हाला शस्त्र बाळगायचा परवाना आहे का? असेल तर दाखवा. यांना शस्त्र बाळगायचा अधिकार आहे का? एकतर आपण तरी पराभूत होऊ, नाहीतर ते तरी पराभूत होतील, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदी चीनच्या प्रश्नावर चर्चा होऊ देत नाही

५६ इंचाची छाती चीनमध्ये १४ इंचाची होते. संसदेच्या सभागृहात आणखी काही माणसे शिल्लक आहेत. ते मोदींना चॅलेंज करत आहेत. पण मोदी चीनविरुद्धच्या प्रश्नावर चर्चा होऊ देत नाही. मोदी आणि चीनचे काय प्रेम आहे, माहिती नाही?, असा टोला आंबेडकर यांनी लगावला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाच्या राजकीय आणि सामाजिक लढ्यात सहभाग नाही. जे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते, त्यांचे चारित्र्य हनन करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी