शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:54 IST

Prakash Ambedkar News: विरोधकांना लकवा मारलेला आहे. विरोधकांना कोणी विचारत नाही. आमच्याशिवाय त्यांच्या विरोधात कुणी लढणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर टीका करताना म्हटले आहे.

Prakash Ambedkar News: विरोधकांना लकवा मारला आहे. त्यामुळे भारताला घेरण्याच्या भूमिकेत जग असताना, व्यक्ती की देश हा प्रश्न उपस्थित होणार आहे. हे केवळ एकट्या नरेंद्र मोदी यांच्यामुळे झालेले आहे. देशाला घेरण्यापासून वाचवायचे असेल, तर नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला सत्तेवर येऊ देता कामा नये. त्यांना बळी पडलात, तर देशाला बळी कराल, हे लक्षात घ्या. देशातील मतदार शहाणपणाने वागणार का, हे त्यांनीच ठरवायचे आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशाला पर्याय कोण असेल, यावर विचार करू नका. तुम्हाला नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षापासून देशाला वाचवायचे आहे. १४० कोटींमधून कुणीतरी पुढे येऊन देशाला चालवू शकतो, ही ताकद आणि हिंमत आहे, यावर विश्वास ठेवा. नरेंद्र मोदी निवृत्त झाले तर चांगले आहे, यामुळे देशाला घेरले जात आहे, ते थांबेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

दिल्लीत जरी इंडिया आघाडी, महाविकास आघाडीची बैठक झाली असली, तरी  शरद पवार हे भाजपाचे हस्तक आहेत. शरद पवार भाजपाचे हस्तक आहेत. ते त्यातून कधीही बाहेर पडू शकत नाहीत. देश पातळीवर घडामोडी करणारी माणसे वेगळी आहेत. तुमच्यासमोर असणारी माणसे वेगळी आहेत. राहुल गांधी, अखिलेश यादव, शरद पवार यांच्यात मोदींना आव्हान देण्याची हिंमत आहे का? विरोधकांना लकवा मारल्याने पंतप्रधान मोदी यांना विरोध करू शकत नाहीत. १५ दिवस थांबा, देशाच्या राजकारणातील एक नवीन बातमी समजेल, असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

दरम्यान, आमच्याशिवाय त्यांच्या विरोधात कुणी लढणार नाही. व्हीव्हीपॅट नसेल, तर आम्ही निवडणुकीत भाग घेणार नाही, असे सांगावे. व्हीव्हीपॅट असेल, तरच निवडणुकीत सामील व्हा. व्हीव्हीपॅट नसेल, तर बॅलेट पेपरवर या. या घडामोडीत विरोधक कुठेही चित्रात नाहीत आणि त्यांना कोणी विचारतही नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी