शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

१३ हजार ६६० पूरग्रस्त ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू

By appasaheb.patil | Updated: August 14, 2019 12:45 IST

सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या कर्मचाºयांची पराकाष्ठा : १० कोटींचे नुकसान; नादुरुस्त मीटर बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

ठळक मुद्देपुरामुळे पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, दक्षिण सोलापूर तालुक्यातील घरगुती, कृषी व वाणिज्यिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होतापाणी ओसरल्यामुळे महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेतले आतापर्यंत ९५ टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, दक्षिण सोलापूरसह काही भागात गेल्या काही दिवसांपासून थैमान घातलेल्या महापुरामुळे खंडित झालेला किंवा संभाव्य धोका टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या सुमारे १३ हजार ६६० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे़ पुरामुळे महावितरणचे १० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, नादुरुस्त मीटर महावितरणकडून स्वखर्चाने बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सोलापूर जिल्ह्यातील काही भागातील पूरस्थितीमुळे १३१ वीजवाहिन्यांच्या वीजपुरवठ्यावर अंशत: परिणाम झाला होता़ दरम्यान, धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील शहरी भागातील २२ व ग्रामीण भागातील १ हजार ९३६ असा १ हजार ९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात आला होता़ याशिवाय २१ हजार ९०० कृषीपंपधारकांचा विद्युत पुरवठाही बंद करण्यात आला होता़ अनेक ठिकाणी पुरामुळे घरात पाणी साचल्याने ग्राहकांचे वीजमीटर नादुरुस्त झाले आहेत़ ज्या भागातील पुराचे पाणी निवळले आहे त्या भागातील ग्राहकांचे वीजमीटर महावितरण स्वखचाने बदलले आहे.

पावसामुळे अनेक भागात बिकट परिस्थिती असून पावसाचे पाणी साचल्यामुळे वीजयंत्रणा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती़ अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवला होता़ या काळात महावितरणच्या वतीने अभियंते, अधिकारी व कर्मचाºयांनी अहोरात्र परिश्रम घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

 पूरस्थिती ओसरल्यानंतर प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस भागातील पूरग्रस्तांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, अकृषक अशा १३ हजार ६६० वीजग्राहकांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यातील १३२ ग्राहक वगळता शहरी भागात १०० टक्के वीजपुरवठा सुरू झाला आहे. तर ग्रामीण भागामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ४९ अशा ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या बंद आहे. हे सर्व ग्राहक अतिदुर्गम तसेच डोंगराळ भागातील असल्याने तेथील वीज यंत्रणेच्या दुरुस्तीला अडथळे येत आहेत. महापुराचा मोठा फटका बसलेल्या शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्याचे अविश्रांत प्रयत्न सुरू असल्याचेही पडळकर यांनी सांगितले.

वीजपुरवठ्याच्या कामांचा दैनंदिन आढावा...सोलापूर जिल्ह्यातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे साहित्य व कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे सर्व नियोजन करण्यात आले आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार हे वीजपुरवठ्याच्या कामांचा दैनंदिन आढावा घेत आहेत. पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक सुनील पावडे हे गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या दौºयावर आहेत.

सोलापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल भोसले हे आवश्यक साधनसामुग्रीसह अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्याचे नियोजन तसेच इतर शासकीय यंत्रणेसोबत समन्वयासाठी कार्यरत आहेत. वीजयंत्रणेची दुरुस्ती व कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करीत आहेत. पुणे, बारामती व सातारा येथील पथकांसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणचे अभियंते व कर्मचारी आणि कंत्राटी कुशल कर्मचारी असे सुमारे ५ हजार अभियंता व कर्मचारी वीजयंत्रणा दुरुस्ती व वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात युद्धपातळीवर कार्यरत आहेत. 

ग्रामीण भागातील ९५ टक्के वीजपुरवठा सुरळीत- पूरग्रस्त पंढरपूर, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर आदी भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे़ घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक व कृषीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे़ नीरा व भीमा नदीत पाणी सोडल्यामुळे या नदीलगत असलेल्या शेतीचा वीजपुरवठा अद्याप सुरळीत होऊ शकला नाही़ मात्र त्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता पडळकर यांनी दिली़

पुरामुळे पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, दक्षिण सोलापूर तालुक्यातील घरगुती, कृषी व वाणिज्यिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता़ मात्र पाणी ओसरल्यामुळे महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेतले आहे़ आतापर्यंत ९५ टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून, उर्वरित ग्राहकांचा येत्या २४ तासात पूर्ण होईल़ महावितरण स्वखर्चाने मीटर बदलत आहे़ २०० कर्मचाºयांचे पथक आपत्ती निवारणासाठी अहोरात्र काम करीत आहे़ ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे़- ज्ञानदेव पडळकर,अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर मंडल

अजूनही ८७ घरे बंद अवस्थेत- पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस या पूरग्रस्त भागातील लोक घरात पाणी शिरल्यामुळे स्थलांतरित झाले होते़ स्थलांतरित झालेले लोक अद्याप परत आले नसल्यामुळे जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील ८७ घरे अद्याप बंद अवस्थेत आहेत़ त्यामुळे या घरातील वीजपुरवठा अद्याप सुरळीत करण्यात आला नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे़ ज्या दिवशी ते लोक आपल्या घरी येतील त्यांना २४ तासांच्या आत वीजपुरवठा करण्यात येईल, असेही महावितरणने कळविले आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरPandharpurपंढरपूर