शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भूमिपुत्रांची ताकद सरकारला दाखवू

By admin | Updated: March 2, 2017 02:14 IST

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याकडे शासन, सिडको व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याकडे शासन, सिडको व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आता सरकारला आपली ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. निर्णायक लढ्यासाठी तयार व्हा असे आवाहन प्रकल्पग्रस्त तरूणांनी नेरूळमधील सभेत केले आहे. गरजेपोटी बांधलेली घरे, साडेबारा टक्के भुखंडांचे वितरण करण्यात यावे. सामाजीक सुविधेसाठी कपात केलेल्या पावणेचार टक्के योजनेचे भुखंड प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना द्यावे. गावांमधील घरांवर सुरू केलेली कारवाई थांबविण्यात यावी व इतर मागण्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्याचा इशारा आगरी कोळी युथ फाऊंडेशनने दिला आहे. यासाठी प्रत्येक गावामध्ये बैठकांचे आयोजन करण्यास सुरवात झाली आहे. नेरूळमध्ये आयोजीत केलेल्या बैठकीला दोन हजार पेक्षा जास्त ग्रामस्थ उपस्थित होते. यामुळे बैठकीला सभेचे स्वरूप प्राप्त झाले होते. आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी निर्णायक लढ्यासाठी सर्वांनी संघटीत होण्याचे आवाहन केले. यावेळी कोमल ठाकूर यांनी शासनदरबारी प्रलंबीत असलेल्या प्रश्नांविषयी माहिती दिली. यावेळी नगरसेवक नामदेव भगत, गिरीश म्हात्रे, युवा नेते वैभव नाईक, निशांत भगत यांनीही मार्गदर्शन करून आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. नेरूळमधील सभेमध्ये आगरी कोळी युथ फाऊंडेशनच्या महिला पदाधिकारी रेशमाताई पाटील, रोशना पाटील, निकिता भोपी, प्रेरणा ठाकूर, कल्पेश घरत. जुलकेशा कडू, यांनीही मनोगत व्यक्त केले. जो पर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत तो पर्यंत माघार घ्यायची नाही असा इशारा यावेळी सर्वांनी दिला. (प्रतिनिधी)