वीजसंकट कायम!
By Admin | Updated: June 4, 2014 01:12 IST2014-06-04T01:12:33+5:302014-06-04T01:12:33+5:30
राज्यातील तीन खाजगी वीज कंपन्यांच्या वीज उत्पादन संचात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने निर्माण झालेले वीजसंकट अद्यापही दूर करण्यात महावितरणला यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना

वीजसंकट कायम!
१२00 मेगावॅट : केंद्रीय विद्युत एक्सचेंजकडून घेणार
नागपूर : राज्यातील तीन खाजगी वीज कंपन्यांच्या वीज उत्पादन संचात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने निर्माण झालेले वीजसंकट अद्यापही दूर करण्यात महावितरणला यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना पुन्हा काही दिवस भरनियमनाचा सामना करावा लागू शकतो. त्याच वेळी महावितरण मात्र उद्यापर्यंंंंत (बुधवार) सद्यस्थितीत सुधारणा होण्याची आशा व्यक्त करीत आहे.
या वीजसंकटामुळे नागरिकांना गत दोन दिवसांपासून भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. माहिती सूत्रानुसार, राज्यातील अदानी वीज प्रकल्पासह इंडिया बुल्स व जेएसडब्ल्यू एनर्जी या कंपन्यांच्या काही संचांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ते बंद पडले आहे. त्यामुळे सुमारे ३ हजार मेगावॅट वीज उत्पादन ठप्प झाले आहे. महावितरण विजेचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्रीय विद्युत एक्सचेंजमधून वीज खरेदी करीत आहे. त्यानुसार उद्यासाठी (बुधवार) १२00 मेगावॅट वीज घेण्यात येणार आहे. शिवाय अदानी प्रकल्पातील ६६0 मेगावॅटचा बंद पडलेला संच ५ जूनपर्यंंंंत पूर्ववत सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच जेएसडब्ल्यूचा ३00 मेगावॅटचा संच यापूर्वीच सुरू झाला आहे. गत १ जून रोजी अदानीचे ६६0 मेगावॅटचे दोन संच व इंडिया बुल्सचे २७५ मेगावॅटचे दोन संच अचानक बंद झाले होते. त्यापैकी या दोन्ही कंपन्यांचे प्रत्येकी एक संच पूर्ववत सुरू झाले असून, अदानीचा दुसरा संच ५ जून रोजी सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)