शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

सत्तांतराचा विदर्भाला फटका; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रुग्णांना गाठावी लागणार मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 16:08 IST

आधीचे मुख्यमंत्री विदर्भातील होते, म्हणून रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईचे आहेत. मात्र त्यांनी विदर्भातील रुग्णांसाठी येथील कक्ष पुन्हा कार्यान्वित करावे, अशी मागणी विदर्भवासियांकडून करण्यात येत आहे.

मुंबई - राज्यातील सत्तांतराचा सर्वाधिक फटका भाजपला बसला आहे. मात्र भाजपसोबत आता विदर्भातील रुग्णांनाही सत्तांतराचा त्रास होणार असं दिसत आहे. त्याचं कारणही तसच असून उपराजधानी नागपूर येथे असलेलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मुंबईला हलवण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मुंबईला हलवल्यामुळे बुलडाणा ते गडचिरोली येथील रुग्णांची परवड होणार असून मदतीसाठी या रुग्णांना मुंबईच गाठावी लागणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विदर्भातील रुग्णांसाठी नागपूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू केले होते. त्यामुळे विदर्भातील रुग्णांना मोठा आधार मिळाला होता. मागील काही वर्षांत सुमारे 50 कोटी रुपयांच्या निधीचे वाट या कक्षातून झाले आहे. 

दरम्यान माजीमंत्री आणि भाजपनेते चंद्रशखेर बावनकुळे यांनी विदर्भातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यावर नवनिर्वाचित मंत्री नितीन राऊत यांनी येथील वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असं म्हटले आहे. 

आधीचे मुख्यमंत्री विदर्भातील होते, म्हणून रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईचे आहेत. मात्र त्यांनी विदर्भातील रुग्णांसाठी येथील कक्ष पुन्हा कार्यान्वित करावे, अशी मागणी विदर्भवासियांकडून करण्यात येत आहे.