शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

गणेशभक्तांच्या वाटेत खड्डे; मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था, चाकरमान्यांचा प्रवास खडतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 06:58 IST

दरवर्षी कोकणात गौरी-गणपती सणासाठी चाकरमान्यांना या  खड्डेमय मार्गावरूनच प्रवास करावा लागतो.

- अनिल पवार नागोठणे : गेले काही वर्षे दुरवस्थेच्या गर्तेत अडकलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची व्यथा, महामार्गाचा वनवास काही केल्या संपत नाही. यामुळे कोकणवासीयांना या मार्गावरून प्रवास करताना सर्वात जास्त अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, अपूर्ण अवस्थेत असलेल्या या मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षीच पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडतात. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची डोकेदुखी वाढते. 

दरवर्षी कोकणात गौरी-गणपती सणासाठी चाकरमान्यांना या  खड्डेमय मार्गावरूनच प्रवास करावा लागतो. यावर्षीही महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर पळस्पे-इंदापूर या पहिल्या टप्प्यातील वडखळ ते इंदापूर या दरम्यान डोळवी, गडब, आमटेम, पळस, नागोठणे ते कोलाड दरम्यान तसेच कोलाड ते इंदापूर दरम्यान अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

काही ठिकाणी तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंदापूर येथील आयोजित भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमात मुंबई-गोवा महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम एका वर्षात पूर्ण होईल अशी ग्वाही दिली होती; मात्र अद्यापही कासू ते कोलाड दरम्यान सिमेंट काँक्रीट रस्ता अर्धवट स्थितीत आहे. दरम्यान, हा महामार्ग म्हणजे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरला आहे. दुरवस्थेमुळे सतत कोंडी होत असते.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग