शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

टपाल कर्मचाऱ्यांचा एल्गार; आज देशभर धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 06:19 IST

देशात २५ हजार टपाल कर्मचाऱ्यांच्या जागा नव्याने निर्माण करण्यासह टपाल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील टपाल कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आंदोलन छेडले आहे.

भोसरी : देशात २५ हजार टपाल कर्मचाऱ्यांच्या जागा नव्याने निर्माण करण्यासह टपाल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील टपाल कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आंदोलन छेडले आहे. याअंतर्गत देशभरातील विभागीय कार्यालयांसमोर आज धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.टपाल कर्मचारी संघटनांकडून मागील वर्षभरापासून विविध मार्गांनी केंद्र व राज्य सरकारकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप त्याला प्रतिसाद न लाभल्याने देशभरातील टपाल कर्मचारी संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मागील महिन्यात २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत टपाल कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून काम केले होते. त्यानंतर आता शुक्रवारी देशभरातील विभागीय कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात एकूण ४७ विभागीय कार्यालये आहेत. त्यात पुण्यातील कार्यालयांचा समावेश आहे.पोस्टमन व एमटीएस कर्मचाºयांच्या रिक्त जागा भरा व रिक्त होणाºया जागा त्याच वर्षामध्ये नियमित भरा. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून देशात २५ हजार टपाल कर्मचाºयांच्या जागा निर्माण कराव्यात. डायरेक्टरेड, सर्कल, डिव्हिजन स्तरावरील मासिक, चौमाही, आरजेसीएम आदी सभा वेळेवर घ्याव्यात. कर्मचाऱ्यांना पत्रे वितरित करण्यासाठी डोअर टू डोअर टाइम फॅक्टर द्यावा, एमटीएस (मल्टिटास्किंग स्टाफ) व आयपी (इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट) परीक्षेला बसण्यास परवानगी द्यावी. एटीएमसाठी बंदूकधारी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.२ जानेवारी २०१९ रोजी सर्व सर्कल कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ६ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्लीतील डाकभवन कार्यालयावर देशभरातील टपाल कर्मचारी धडकणार आहेत, अशी माहिती नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईजचे पुणे शहर पूर्व विभागाचे सचिव डी. आर. देवकर यांनी दिली.आठ वर्षांपासून भरती रखडलीराज्यभरात गेल्या आठ वर्षांत टपाल खात्यातील प्रादेशिक विभागात कर्मचाºयांची भरती झाली नाही. यामुळे प्रत्येक कार्यालयात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कामगार शिल्लक आहेत. अपुºया कर्मचारी संख्येमुळे प्रचंड कामाचा ताण जाणवत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ४० टक्के टपाल कर्मचारी आणि एमटीएस कर्मचाºयांच्या जागा अपुºया आहेत. यामुळे टपाल खाते नागरिकांना योग्य सुविधा पुरवू शकत नाही. थेट, अनुकंपा, जीडीएस, खेळाडू आदीमधून या जागा भरून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी टपाल कर्मचाºयांची मागणी आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसIndiaभारत