शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

टपाल कर्मचाऱ्यांचा एल्गार; आज देशभर धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 06:19 IST

देशात २५ हजार टपाल कर्मचाऱ्यांच्या जागा नव्याने निर्माण करण्यासह टपाल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील टपाल कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आंदोलन छेडले आहे.

भोसरी : देशात २५ हजार टपाल कर्मचाऱ्यांच्या जागा नव्याने निर्माण करण्यासह टपाल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील टपाल कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आंदोलन छेडले आहे. याअंतर्गत देशभरातील विभागीय कार्यालयांसमोर आज धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.टपाल कर्मचारी संघटनांकडून मागील वर्षभरापासून विविध मार्गांनी केंद्र व राज्य सरकारकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप त्याला प्रतिसाद न लाभल्याने देशभरातील टपाल कर्मचारी संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मागील महिन्यात २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत टपाल कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून काम केले होते. त्यानंतर आता शुक्रवारी देशभरातील विभागीय कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात एकूण ४७ विभागीय कार्यालये आहेत. त्यात पुण्यातील कार्यालयांचा समावेश आहे.पोस्टमन व एमटीएस कर्मचाºयांच्या रिक्त जागा भरा व रिक्त होणाºया जागा त्याच वर्षामध्ये नियमित भरा. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून देशात २५ हजार टपाल कर्मचाºयांच्या जागा निर्माण कराव्यात. डायरेक्टरेड, सर्कल, डिव्हिजन स्तरावरील मासिक, चौमाही, आरजेसीएम आदी सभा वेळेवर घ्याव्यात. कर्मचाऱ्यांना पत्रे वितरित करण्यासाठी डोअर टू डोअर टाइम फॅक्टर द्यावा, एमटीएस (मल्टिटास्किंग स्टाफ) व आयपी (इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट) परीक्षेला बसण्यास परवानगी द्यावी. एटीएमसाठी बंदूकधारी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.२ जानेवारी २०१९ रोजी सर्व सर्कल कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ६ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्लीतील डाकभवन कार्यालयावर देशभरातील टपाल कर्मचारी धडकणार आहेत, अशी माहिती नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईजचे पुणे शहर पूर्व विभागाचे सचिव डी. आर. देवकर यांनी दिली.आठ वर्षांपासून भरती रखडलीराज्यभरात गेल्या आठ वर्षांत टपाल खात्यातील प्रादेशिक विभागात कर्मचाºयांची भरती झाली नाही. यामुळे प्रत्येक कार्यालयात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कामगार शिल्लक आहेत. अपुºया कर्मचारी संख्येमुळे प्रचंड कामाचा ताण जाणवत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ४० टक्के टपाल कर्मचारी आणि एमटीएस कर्मचाºयांच्या जागा अपुºया आहेत. यामुळे टपाल खाते नागरिकांना योग्य सुविधा पुरवू शकत नाही. थेट, अनुकंपा, जीडीएस, खेळाडू आदीमधून या जागा भरून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी टपाल कर्मचाºयांची मागणी आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसIndiaभारत