शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

...तर शिवसेना करणार भाजपाशी चर्चा; महायुतीच्या चर्चेची दारे उघडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 05:37 IST

भाजपशी झालेली सत्तास्थापनेची चर्चा निष्फळ ठरली, काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला नाही

मुंबई : भाजपशी झालेली सत्तास्थापनेची चर्चा निष्फळ ठरली, काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला नाही अशा दुहेरी अपयशानंतर शिवसेना आता पुन्हा भाजपशी सत्तास्थापनेबाबत चर्चा करेल आणि भाजपही त्याला प्रतिसाद देईल, अशी शक्यता आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यानंतर दोघांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला. प्रत्येकी अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेने मागितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या चर्चेत भाजपने तसा शब्द दिला होता, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. तसा कोणताही शब्द दिलेला नव्हता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या.भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले पण भाजपने त्या बाबत असमर्थता व्यक्त केली. आता शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंबा देईल अशी शक्यता फारच कमी आहे. अशावेळी पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेत चर्चा सुरू होऊ शकते. राज्यातील भाजपचे नेतृत्व शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करावी यासाठी आग्रही आहे आणि भाजपच्या कोअर कमिटीने तशी भावना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना कळविली होती.विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, भाजपचे दिल्लीतील नेतृत्व शिवसेनेशी सत्तासोबत करण्यास आता फारशी उत्सुक नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसात केलेली टोकाची टीका भाजपश्रेष्ठींच्या जिव्हारी लागली आहे. अशावेळी दोघांमध्ये चर्चा व्हायची तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आपल्या पक्षश्रेष्ठींचे मन वळवावे लागणार आहे. केलेल्या टीकेबाबत शिवसेनेने दिलगिरी व्यक्त करावी, अशी अटदेखील घातली जाऊ शकते. ते शक्य झाले तर चर्चेची दारे पुन्हा उघडू शकतात. भाजप व शिवसेनेचे बहुसंख्य आमदार हे युतीची सत्ता स्थापन व्हावी असे खासगीत मोकळेपणाने बोलतात. दुसरीकडे मुख्यमंत्रि पदाबाबत शब्द दिलेला नव्हता, हे मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला खटकलेले वाक्य मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले आणि परत एकदा युतीसाठी साद घातली तर दोन्ही पक्ष जवळ येऊ शकतात.मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मुखभंग झालेल्या शिवसेनेची आता सत्तावाटपाबाबत भाजपशी चर्चा करताना ‘बार्गेनिंग पॉवर’ मात्र कमी झालेली असेल. अशावेळी अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदाचा आग्रह शिवसेना किती लावून धरु शकेल, या बाबत साशंकता आहे.राज्यात आगामी काही दिवसात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर युतीच्या सत्ताचर्चेसाठी पुरेसा वेळ दोन्ही पक्षांना मिळेल. दोघांनी मिळून सत्ता स्थापन करावी असा दबाव दोन्ही पक्षांच्या आमदारांकडून पक्षनेतृत्वावर वाढेल.>‘वर्षा’वर बैठकांचा जोरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे अन्य नेते आज दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठका करीत होते. पक्षाची कोअर कमिटी मुंबई, दिल्लीतील घडामोडींवर लक्ष ठेवून होती. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस