शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

...तर शिवसेना करणार भाजपाशी चर्चा; महायुतीच्या चर्चेची दारे उघडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 05:37 IST

भाजपशी झालेली सत्तास्थापनेची चर्चा निष्फळ ठरली, काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला नाही

मुंबई : भाजपशी झालेली सत्तास्थापनेची चर्चा निष्फळ ठरली, काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला नाही अशा दुहेरी अपयशानंतर शिवसेना आता पुन्हा भाजपशी सत्तास्थापनेबाबत चर्चा करेल आणि भाजपही त्याला प्रतिसाद देईल, अशी शक्यता आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यानंतर दोघांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला. प्रत्येकी अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेने मागितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या चर्चेत भाजपने तसा शब्द दिला होता, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. तसा कोणताही शब्द दिलेला नव्हता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या.भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले पण भाजपने त्या बाबत असमर्थता व्यक्त केली. आता शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंबा देईल अशी शक्यता फारच कमी आहे. अशावेळी पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेत चर्चा सुरू होऊ शकते. राज्यातील भाजपचे नेतृत्व शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करावी यासाठी आग्रही आहे आणि भाजपच्या कोअर कमिटीने तशी भावना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना कळविली होती.विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, भाजपचे दिल्लीतील नेतृत्व शिवसेनेशी सत्तासोबत करण्यास आता फारशी उत्सुक नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसात केलेली टोकाची टीका भाजपश्रेष्ठींच्या जिव्हारी लागली आहे. अशावेळी दोघांमध्ये चर्चा व्हायची तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आपल्या पक्षश्रेष्ठींचे मन वळवावे लागणार आहे. केलेल्या टीकेबाबत शिवसेनेने दिलगिरी व्यक्त करावी, अशी अटदेखील घातली जाऊ शकते. ते शक्य झाले तर चर्चेची दारे पुन्हा उघडू शकतात. भाजप व शिवसेनेचे बहुसंख्य आमदार हे युतीची सत्ता स्थापन व्हावी असे खासगीत मोकळेपणाने बोलतात. दुसरीकडे मुख्यमंत्रि पदाबाबत शब्द दिलेला नव्हता, हे मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला खटकलेले वाक्य मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले आणि परत एकदा युतीसाठी साद घातली तर दोन्ही पक्ष जवळ येऊ शकतात.मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मुखभंग झालेल्या शिवसेनेची आता सत्तावाटपाबाबत भाजपशी चर्चा करताना ‘बार्गेनिंग पॉवर’ मात्र कमी झालेली असेल. अशावेळी अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदाचा आग्रह शिवसेना किती लावून धरु शकेल, या बाबत साशंकता आहे.राज्यात आगामी काही दिवसात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर युतीच्या सत्ताचर्चेसाठी पुरेसा वेळ दोन्ही पक्षांना मिळेल. दोघांनी मिळून सत्ता स्थापन करावी असा दबाव दोन्ही पक्षांच्या आमदारांकडून पक्षनेतृत्वावर वाढेल.>‘वर्षा’वर बैठकांचा जोरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे अन्य नेते आज दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठका करीत होते. पक्षाची कोअर कमिटी मुंबई, दिल्लीतील घडामोडींवर लक्ष ठेवून होती. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस