शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

...तर शिवसेना करणार भाजपाशी चर्चा; महायुतीच्या चर्चेची दारे उघडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 05:37 IST

भाजपशी झालेली सत्तास्थापनेची चर्चा निष्फळ ठरली, काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला नाही

मुंबई : भाजपशी झालेली सत्तास्थापनेची चर्चा निष्फळ ठरली, काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला नाही अशा दुहेरी अपयशानंतर शिवसेना आता पुन्हा भाजपशी सत्तास्थापनेबाबत चर्चा करेल आणि भाजपही त्याला प्रतिसाद देईल, अशी शक्यता आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यानंतर दोघांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला. प्रत्येकी अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेने मागितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या चर्चेत भाजपने तसा शब्द दिला होता, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. तसा कोणताही शब्द दिलेला नव्हता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या.भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले पण भाजपने त्या बाबत असमर्थता व्यक्त केली. आता शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंबा देईल अशी शक्यता फारच कमी आहे. अशावेळी पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेत चर्चा सुरू होऊ शकते. राज्यातील भाजपचे नेतृत्व शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करावी यासाठी आग्रही आहे आणि भाजपच्या कोअर कमिटीने तशी भावना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना कळविली होती.विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, भाजपचे दिल्लीतील नेतृत्व शिवसेनेशी सत्तासोबत करण्यास आता फारशी उत्सुक नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसात केलेली टोकाची टीका भाजपश्रेष्ठींच्या जिव्हारी लागली आहे. अशावेळी दोघांमध्ये चर्चा व्हायची तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आपल्या पक्षश्रेष्ठींचे मन वळवावे लागणार आहे. केलेल्या टीकेबाबत शिवसेनेने दिलगिरी व्यक्त करावी, अशी अटदेखील घातली जाऊ शकते. ते शक्य झाले तर चर्चेची दारे पुन्हा उघडू शकतात. भाजप व शिवसेनेचे बहुसंख्य आमदार हे युतीची सत्ता स्थापन व्हावी असे खासगीत मोकळेपणाने बोलतात. दुसरीकडे मुख्यमंत्रि पदाबाबत शब्द दिलेला नव्हता, हे मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला खटकलेले वाक्य मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले आणि परत एकदा युतीसाठी साद घातली तर दोन्ही पक्ष जवळ येऊ शकतात.मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मुखभंग झालेल्या शिवसेनेची आता सत्तावाटपाबाबत भाजपशी चर्चा करताना ‘बार्गेनिंग पॉवर’ मात्र कमी झालेली असेल. अशावेळी अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदाचा आग्रह शिवसेना किती लावून धरु शकेल, या बाबत साशंकता आहे.राज्यात आगामी काही दिवसात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर युतीच्या सत्ताचर्चेसाठी पुरेसा वेळ दोन्ही पक्षांना मिळेल. दोघांनी मिळून सत्ता स्थापन करावी असा दबाव दोन्ही पक्षांच्या आमदारांकडून पक्षनेतृत्वावर वाढेल.>‘वर्षा’वर बैठकांचा जोरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे अन्य नेते आज दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठका करीत होते. पक्षाची कोअर कमिटी मुंबई, दिल्लीतील घडामोडींवर लक्ष ठेवून होती. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस