मध्यावधी निवडणुकीची शक्यता - चव्हाण
By Admin | Updated: April 8, 2015 02:18 IST2015-04-08T02:18:44+5:302015-04-08T02:18:44+5:30
गेले पाच महिने सत्तेवर असलेले राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. भू-संपादन, गोवंश हत्याबंदी आदी महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांची धरसोड भूमिका आहे.

मध्यावधी निवडणुकीची शक्यता - चव्हाण
मुंबई : गेले पाच महिने सत्तेवर असलेले राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. भू-संपादन, गोवंश हत्याबंदी आदी महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांची धरसोड भूमिका आहे.
त्यामुळे आपापसांतील मतभेदामुळे ते कोसळून केव्हाही मुदतपूर्व विधानसभा निवडणूक लागू शकते, असे भाकित वर्तवून वांद्रे (प.) पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.
खा. चव्हाण यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट देऊन कॉंग्रेसच्या आगामी वाटचालीची माहिती दिली.
ते म्हणाले, प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षासाठी पूर्ण वेळ देत पुनर्बांधणी करण्याचे आपण ठरवले आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी संघटनात्मक बदलाची गरज आहे,
तेथे योग्य व सक्षम कार्यकर्त्याला
संधी दिली जाईल. त्यासाठी आमदार भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती स्थापन
केलेली आहे. त्या जिल्ह्णात जाऊन तेथील पक्षाची परिस्थिती, कार्यकर्त्यांची मते आजमाविली जातील. चार महिन्यांत त्याचा
अहवाल आल्यानंतर योग्य ते बदल केले जातील.
‘अच्छे दिन’चे आमिष दाखवित केंद्रात व राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाचे खरे रूप जनतेला कळू लागले आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या १० महिन्यांत एकही निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचा झालेला नाही. त्यामुळे सरकारविषयी
नाराजी वाढत आहे, असा दावाही त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसबाबत ते म्हणाले, सध्या ते द्विधा मन:स्थितीत आहेत. कधी सरकारच्या बाजूने तर कधी विरोधात भूमिका घेतात, त्यामागची नेमकी कारणे त्यांनाच माहीत असतील. नवी मुंबई, औरंगाबादमध्ये तर राष्ट्रवादीशी आघाडी न करता आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहोत.