शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
3
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
4
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
5
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
6
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
7
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
8
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
9
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
10
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
11
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
12
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
13
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
14
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
15
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
16
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
17
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
18
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
19
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
20
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना

सारांश: आयुष्य म्हणजे... मज्जाच मज्जा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 11:58 IST

मित्र, नातेवाईक यांना जोडून राहायला हवे. त्यांच्यामुळे आयुष्यात खरे जगता येते. सुखी जीवनाचा हाच खरा मंत्र आहे.

चंद्रकांत दडस, उपसंपादक, लोकमत, मुंबई

ध्या प्रत्येकाच्या आयुष्यात, कुटुंबात सतत ताणतणाव दिसतो. अनेकांचे आयुष्य सुन्न झाल्यासारखे असते. आयुष्यात सतत घटना घडत असतात, विचित्र परिस्थिती निर्माण होते, आर्थिक अडचणी निर्माण होतात. या सर्व गोष्टींकडे आपण कोणत्या दृष्टिकोणातून पाहतो, हे महत्त्वाचे आहे. बाहेर कितीही कठीण परिस्थिती असली तरीही घडणाऱ्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे, यावरून तुम्हाला समोरची परिस्थिती, माणसे दिसतात. आपण आपला दृष्टिकोन चांगला ठेवला तर कोणतेही, कितीही मोठे संकट आले तरी तुम्ही त्यावर सहज मात करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबाची सोबत कधीही सोडू नका...

जशी दृष्टी तशी सृष्टी. तुम्ही तुमच्या आयुष्याकडे, कुटुंबाकडे, भूतकाळाकडे, नातेवाइकांकडे, समाजाकडे, जगाकडे, समस्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघता, हे खूप महत्त्वाचे आहे. आयुष्य सुंदर आहे, मज्जाज मजा असे समजून सतत वाटचाल करत राहिले पाहिजे. आयुष्यात अडचणी आल्या की आपण भावनिक, नाउमेद होतो. रडत बसतो. मात्र त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी वाढत जातात. केवळ विचार करत बसण्यापेक्षा सतत कृती केल्यास कोणत्याही अडचणीवर मात करता येते. सुखी जीवनासाठी आणखी एक मंत्र म्हणजे आपण मनातल्या मनात खूप गोष्टी दाबून ठेवतो. आपण बोलत नाही. मात्र तसे न करता व्यक्त व्हा. मनातील गोष्टी कुणापुढे तरी मोकळ्या करा.

सध्या नात्यांमध्ये प्रचंड नाहक अपेक्षा वाढल्या आहेत; मात्र या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर उदासीनता येते. वाद वाढतो. यात स्वत: मात्र कृती केली जात नाही. केवळ दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवल्या जातात. विचार जास्त आणि कृती कमी असेल तर अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याबरोबर कधीही तुलना करू नका. जे आहे ते आणि नाही ते स्वीकारा. आपल्यामध्ये अलीकडे मालकीची भावना वाढीस लागली आहे. जे काही आजुबाजूला आहे ते माझे असले पाहिजे, ही अपेक्षा वाढीस लागली आहे. मात्र यामुळे हातात खूप काही लागत नाही. मालकीऐवजी विश्वस्ताची भावना ठेवली तर भरपूर काही आयुष्यात येत राहते. मी, पत्नी आणि मूल ही भावना अलीकडे मोठ्या प्रमाणात रुजली जात आहे; मात्र यामुळे भीती आणि असुरक्षितता वाढीस लागली आहे.

एकत्र कुटुंबाचे फायदे...

- कुटुंब एकत्र असेल तर रोज एक सण असतो.- प्रत्येकाच्या सुख, दु:खाच्या गोष्टीची चर्चा होते.- जबाबदारीची भावना वाढते.- आपल्या वस्तू इतरांना देण्याची भावना वाढते.- गरजेच्या वेळी आर्थिक मदत होते.- घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा होतो.- मानसिक स्थिती उत्तम राहते.- लहान मुले एकटी पडत नाहीत.- मुलांवर चांगले संस्कार होतात.- एकत्र कुटुंबात पुस्तकांवर चर्चा होते.- सामाजिक सुरक्षा मिळते.

न्युक्लीअर कुटुंबाचे तोटे...

- अडचणीच्या वेळी निर्णय घेता पाठिंबा मिळत नाही.- भावनात्मक नाते संपते.- घरात वाद झाल्यास दुसरे कोणी मदतीला येत नाही.- लहान मुलांमध्ये ऐकटेपणाची भावना वाढीस लागते.- मानसिक गरजा पूर्ण होत नाहीत.- लहान मुलांना प्रेम मिळत नाही.

टॅग्स :Familyपरिवार