जिल्ह्यातील लोकसंख्येचा आलेख चढता
By Admin | Updated: July 11, 2014 00:13 IST2014-07-11T00:13:14+5:302014-07-11T00:13:14+5:30
तीन दशकांतील लोकसंख्येच्या दरवाढीचा विचार करता ठाणो जिल्ह्याच्या लोकसंख्यावाढीचा आलेख सातत्याने वाढत आहे.

जिल्ह्यातील लोकसंख्येचा आलेख चढता
सुरेश लोखंडे - ठाणो
तीन दशकांतील लोकसंख्येच्या दरवाढीचा विचार करता ठाणो जिल्ह्याच्या लोकसंख्यावाढीचा आलेख सातत्याने वाढत आहे. 2क्क्1 च्या जनगणनेमध्ये 35.91 टक्के दरवाढ होऊन ती 2क्11 मध्ये एक कोटी 1क् लाख 54 हजार 131 झाली आहे. जगातील 119 देशांच्या तुलनेत ठाणो जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक असल्याचे उघड झाले आहे.
जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून आढावा घेतला असता जगातील 193 देशांपैकी 119 देशांच्या लोकसंख्येपेक्षा ठाणो जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक असल्याचे जिल्हाधिका:यांच्या एका अहवालाद्वारे उघड झाले आहे. याशिवाय, देशामधील 17 राज्ये व सर्व केंद्रशासित प्रदेशांपेक्षा ठाण्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. अन्य क्षेत्रंसह लोकसंख्येच्या दृष्टीनेदेखील अग्रभागी राहिलेल्या ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 ऑगस्टपासून पालघर जिल्हा अस्तित्वात येणार आहे.
तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या तालुक्यांच्या 14 लाख 35 हजार 178 लोकसंख्येचा नवा पालघर जिल्हा राहणार आहे. उर्वरित राहिलेल्या शहरी भागांच्या ठाणो जिल्ह्यात ठाणो, भिवंडी, शहापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाड आदी तालुक्यांची सर्वाधिक 96 लाख 18 हजार 953 लोकसंख्या शिल्लक राहणार आहे. सध्याच्या एकसंध जिल्ह्याच्या एक कोटी 1क् लाख 54 हजार 131 लोकसंख्येपैकी शहरी भागांत 85 लाख तीन हजार 94 लोक वास्तव्याला आहेत. उर्वरित 25 लाख 51 हजार 37 लोक ग्रामीण, दुर्गम भागात वास्तव्य करीत आहेत.
राज्याच्या लोकसंख्येपैकी 9.84 टक्के लोकसंख्या ठाणो जिल्ह्यात आहे. 72.58 टक्के नागरी लोकसंख्या असलेला ठाणो जिल्हा मुंबईच्या दोन जिल्ह्यांनंतर सर्वाधिक नागरीकरण झालेला जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 1157 इतकी आहे. राज्याचे हे प्रमाण केवळ 365 इतके आहे.
9558 चौ.कि.मी. क्षेत्रफळाच्या या जिल्ह्याचे क्षेत्रफळ राज्याच्या क्षेत्रफळाच्या 3.11 टक्के आहे. जिल्ह्याच्या 15 तालुक्यांपैकी शहापूर तालुक्याचे क्षेत्रफळ सर्वाधिक 1629 चौ.किमी. आहे. सर्वात लहान तालुका म्हणून ओळखल्या जाणा:या उल्हासनगरचे क्षेत्रफळ केवळ 13 चौ.किमी. आहे.
राज्याच्या 72क् किमीच्या समुद्रकिना:यापैकी 112 किमी.चा किनारा ठाण्याला लाभला आहे. यातील 11328 हेक्टर क्षेत्र भूजल मासेमारीसाठी अनुकूल आहे. किनारपट्टीलगतच्या लहान-मोठय़ा 82 गावांतून मासेमारी केली जात आहे.
शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांत विभागल्या गेलेल्या ठाणो जिल्ह्याच्या लोकसंख्येपैकी 85 लाख तीन हजार 94 लोकसंख्येमध्ये 45 लाख 73 हजार 958 पुरुष व 39 लाख 29 हजार 136 स्त्रियांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील 25 लाख 51 हजार 37 या लोकसंख्येत 13 लाख पाच हजार 429 पुरुष असून 12 लाख 45 हजार 6क्8 स्त्रिया आहेत. शहरात एक हजार पुरुषांमागे 859 स्त्रिया असे प्रमाण आहे.
ग्रामीण भागात ‘954 स्त्रिया’ असे प्रमाण असल्यामुळे शहराच्या तुलनेत ग्रामीण, दुर्गम भागांत सर्वाधिक महिला वास्तव्याला आहेत. यावरून मुलींचा जन्मदर शहराच्या तुलनेत ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागांत जास्त असल्याचे उघड
झाले आहे.
जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण 86.18 टक्के आहे. यामध्ये पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण 9क्.9क् टक्के असून 8क्.87 टक्के स्त्री साक्षरतेचे प्रमाण आह़े
देशामधील 17 राज्ये व सर्व केंद्रशासित प्रदेशांपेक्षा ठाण्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. अन्य क्षेत्रंसह लोकसंख्येच्या दृष्टीनेदेखील अग्रभागी राहिलेल्या ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 ऑगस्टपासून पालघर जिल्हा अस्तित्वात येणार आहे.
सध्याच्या एकसंध जिल्ह्याच्या एक कोटी 1क् लाख 54 हजार 131 लोकसंख्येपैकी शहरी भागांत 85 लाख तीन हजार 94 लोक वास्तव्याला आहेत. उर्वरित 25 लाख 51 हजार 37 लोक ग्रामीण, दुर्गम भागात वास्तव्य करीत आहेत.