शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

दहा शहरांचा श्वास कोंडला; अनलॉकनंतर वायुप्रदूषण वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 06:56 IST

यंदा दिवाळीत आणि हिवाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत राज्यातील हवा गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ पट अधिक प्रदूषित झाली आहे.   

मुंबई : लॉकडाऊनमध्ये हवेची गुणवत्ता बरीच सुधारली होती. अनलॉकनंतर गर्दी करण्यावर मर्यादा असल्यामुळे तसेच फटाके फोडण्यावर बऱ्यापैकी बंधने आल्यामुळे ती फारशी बिघडली नाही, असा जर तुमचा समज असेल, तर तो तद्दन गैरसमजच होता असे नक्की समजा. कारण अनलॉक आणि त्यापाठोपाठ आलेले दसरा-दिवाळी हे सण आपण इतक्या धडाक्यात साजरे केले की, यंदा दिवाळीत आणि हिवाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत राज्यातील हवा गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ पट अधिक प्रदूषित झाली आहे.   दिल्लीच्या सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) या पर्यावरणविषयक अभ्यास करणाऱ्या प्रख्यात संस्थेने हा धक्कादायक निष्कर्ष मांडला आहे. का वाढले प्रदुषणअनलॉकनंतर उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक, बाजार टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर आल्याने वायुप्रदूषणाने पुन्हा एकदा धोक्याची पातळी गाठली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा हवा अधिक दूषित झाली आहे. सर्वाधिक प्रदूषित दिवस मुंबई, कल्याण    १५ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडानवी मुंबई, नागपूर, नाशिक    २९ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडापुणे    ८ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडाचंद्रपूर    १ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडाऔरंगाबाद    २२ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडासोलापूर    ६ डिसेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडासर्वांत स्वच्छ हवेचे दिवस मुंबई, नवी मुंबई, कल्याण, सोलापूर    ५ जुलै २०२० रोजी संपलेला आठवडानागपूर, नाशिक, पुणे    ऑगस्ट २०२० या महिन्यात औरंगाबाद    २५ मे २०२० रोजी संपलेला आठवडाअहवालातील बाबी बृहन्मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात हवेची प्रदूषण पातळी सध्या धोक्याबाहेर गेली आहे. यंदाच्या हिवाळ्यात स्वच्छ हवेचे दिवस खूप कमी असतील. यंदा दोन आठवड्यांपूर्वीच हिवाळ्याची चाहूल लागली. यंदाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत बृहन्मुंबईत गतवर्षीच्या तुलनेत २५ ते ३० टक्के अधिक वायुप्रदूषण झाले.ऑक्टोबरमध्ये राज्यातील हवा ४० टक्के अधिक दूषित होती तर हे प्रमाण नोव्हेंबरमध्ये सरासरी ४६ टक्के होते. दिवाळीच्या दिवशी तर प्रदूषणाने ६० टक्क्यांची पातळी गाठली होती. स्वच्छ हवेसाठी उपायहवेतील प्रदुषण कमी करायचे असेल तर वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, दर्जेदार इंधनाचा पुरवठा, वीज प्रकल्पांतून कमीतकमी प्रदूषण, कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर या उपायांची कटाक्षाने कास धरावी लागेल.     - अमृता रॉयचौधरी,     कार्यकारी संचालिका, सीएसई 

टॅग्स :pollutionप्रदूषण