राजकीय ‘दादा’गिरी विरोधात लढत राहणार
By Admin | Updated: September 28, 2014 02:25 IST2014-09-28T02:25:41+5:302014-09-28T02:25:41+5:30
सामान्य जनतेच्या हितासाठी राजकीय ‘दादा’गिरीविरोधात यापुढेही लढतच राहणार,’ अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली़

राजकीय ‘दादा’गिरी विरोधात लढत राहणार
>क:हाड (जि़सातारा) : ‘राज्यात आघाडी शासन चालविताना अनेक कठोर निर्णय घेतल़े अनेकांचे हितसंबंध त्यामुळे दुरावल़े कारभार करताना खूप त्रस झाला़ दोन दिवसांपूर्वी तर राज्यातील सरकार पाडण्याचे काम केले; पण त्याचा माङयावर फरक पडत नाही़ सामान्य जनतेच्या हितासाठी राजकीय ‘दादा’गिरीविरोधात यापुढेही लढतच राहणार,’ अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली़
क:हाड दक्षिणचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला़ त्यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होत़े सभापती शिवाजीराव देशमुख, वनमंत्री डॉ़ पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आमदार आनंदराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती़ मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या मोहापायी युती तुटली अन् आघाडीतही बिघाडी झाली़ राष्ट्रवादीने अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपदाची केलेली मागणी म्हणजे सत्तेची वाटणी योग्य नव्हती़ खरंतर त्यांना आघाडी करायचीच नव्हती, फक्त युती तुटायची वाट ते पाहत होत़े युती तुटली रे तुटली की, त्यांनी आघाडी तुटल्याचे जाहीर केल़े आघाडी तोडण्यापाठीमागचे कारण मतदारांनीच शोधण्याची गरज निर्माण झाली आहे, असे ते म्हणाल़े (प्रतिनिधी)
शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल
मुख्यमंत्री चव्हाण यांनी हजारो कार्यकत्र्याच्या उपस्थितीत शनिवारी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला़