शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

राजकारण माझा धंदा नाही, भाजपासह सगळ्याच पक्षांवर नाराज; गिरीश बापटांंचं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 13:57 IST

मी ५० वर्ष मी राजकारणात आहे. एक त्रिकोण, चौक दाखवा जिथे मी माझ्या आईबापाचं नाव दिले. ही कुठली प्रथा आहे. आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे का? सातबारा आपल्या नावावर आहे का? असा संतप्त सवाल बापटांनी केला.

पुणे - राजकीय जीवनात आपण सामाजिक, शैक्षणिक काम करतो. पायाभूत समाजाच्या शेवटपर्यंत जाणे आणि प्रश्न सोडवणे हे आपलं काम आहे. परंतु आता कार्यकर्त्यामधील कार्य मेले अन् फक्त पुढारीच राहिला हे बरोबर वाटत नाही. ४०-४५ वर्ष आम्ही सतत काम करत राहिलो. आपली बांधिलकी समाजाशी आहे. समाज नोंद घेत असतो. मतांच्या राजकारणासाठी काहीही करत राहिलो तर ते चुकीचं आहे असं परखड मत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी मांडले आहे. 

गिरीश बापट म्हणाले की, कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत राहावं. पक्ष त्याची दखल घेत असतो. लोकप्रतिनिधी होण्याची संधी सगळ्यांनाच मिळते असं नाही. जागा मर्यादित आहेत. आरक्षण आहेत. खरा निर्मळ आनंद लोकांचं काम करण्यात असतो. एखाद्याचं काम आपण केले तर त्याच्या चेहऱ्यावर हास्य येते याचा आनंद वाटतो. परंतु नव्या राजकीय संस्कृतीत काम सोडून बाकी सगळे सुरू आहे. हे आमच्यासारख्या जुन्या पिढीतील लोकांना पटत नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा, भाजपाचाही असला तरी ते योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच मी ५० वर्ष मी राजकारणात आहे. एक त्रिकोण, चौक दाखवा जिथे मी माझ्या आईबापाचं नाव दिले. ही कुठली प्रथा आहे. आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे का? सातबारा आपल्या नावावर आहे का? लोकांनी काम करण्यासाठी निवडून दिलेय. लोकांसमोर आदर्श जात नाही. निर्मळ मनाने काम करायला हवं. अधिकाऱ्यांवर वचक निर्माण करण्याचं काम मी केले. आजकाल उद्धाटन, भूमिपूजन करतात, फोटो सोशल मीडियात टाकले जातात हे खरे काम नाही असं गिरीश बापटांनी सांगितले. 

सध्याच्या राजकारणाला व्यावसायिक स्वरुप आमचं भांडणं वैचारिक असले पाहिजे व्यक्तिगत नाही. एखाद्याचे विचार पटले नाही तर लोकशाहीपद्धतीने त्याला सांगितले पाहिजे. सध्याच्या राजकारणाला व्यावसायिक स्वरुप आले आहे. मी ३५ वर्ष नोकरी केली. नगरसेवक, आमदार असतानाही निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. राजकारण हा माझा धंदा नाही. हे माझं व्रत आहे. आम्ही उद्दिष्टे ठेवून काम करतात. अडचणीत असलेल्या माणसांकडून काय अपेक्षा करणार. सगळं मतांच्या राजकारणासाठी केले जातय यात आनंद नाही असं बापटांनी म्हटलं. 

सहन करण्याची हिंमत ताकद हवीज्यादिवशी मी मंत्री झालो तेव्हा एकदिवस माझ्या नावापुढे माजी मंत्री, माजी खासदार, माजी आमदार लागणार आहे. सध्या त्या परिस्थितीत कोण यायला तयार नाही असं कसं चालेल. हे चुकीचे आहे. सर्वपक्षांवर मी नाराज आहे. हे मनाला पटणारं नाही. माझ्या आत्म्याला ते सहन होत नाही. सातत्याने काम करणं हा गुण आहे. राजकीय जीवनात चढ-उतार अनेक असतात. सहन करण्याची हिंमत ताकद हवी असा सल्ला गिरीश बापटांनी सध्याच्या राजकीय नेत्यांना दिला. 

समाज कसा चालणार? शरद पवारांच्या आणि माझ्या पक्षाचे वैचारिक मतभेद नक्की आहेत. अनेक निवडणुकीत मी त्यांच्यावर टीका केलीय. परंतु मी वैयक्तिक पवारांवर किंवा अन्य कुणावरही टीका केली नाही. राजकारणाची पातळी एवढी खालावली की भविष्य काळात कोण राजकारणात येऊन काय करेल, सगळ्या समाजाचं नेतृत्व त्याच्याकडे असते. निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग असतो. ते जर डोक्यात नसेल तर समाज कसा चालणार असा सवालही गिरीश बापटांनी उपस्थित केला. 

टॅग्स :girish bapatगिरीष बापटBJPभाजपाPoliticsराजकारण