शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

राज्यातील हिंसाचारावरून राजकीय आखाडा तापला; केंद्र-राज्य सरकारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 06:58 IST

राज्यात राजकीय आखाडा तापला असून राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू केली आहे. 

मुंबई : त्रिपुरातील कथित धार्मिक हिंसाचारावरून राज्यात शुक्रवारी बंददरम्यान ज्या हिंसक घटना घडल्या त्याविरोधात राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदवेळी अमरावतीत शनिवारी पुन्हा हिंसाचार होऊन संचारबंदी लावण्यात आली. त्यानंतर राज्यात राजकीय आखाडा तापला असून राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू केली आहे. नांदेडमध्ये तीनशे जणांवर गुन्हे शुक्रवारी नांदेड बंददरम्यान करण्यात आलेल्या दगडफेक व वाहने जाळपोळ प्रकरणात विविध पोलीस ठाण्यांत तीनशे जणांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत तर दहाहून अधिक जणांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड सुरू होती. शहराच्या विविध भागात लावलेले सीसीटिव्ही कॅमेरे, व्हिडीओवरुन आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे. रझा ॲकॅडमीच्या आयोजकांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. 

मालेगावमध्ये दहा अटकेत, ५०० जणांविरुद्ध गुन्हामालेगाव : त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या शुक्रवारच्या बंदला हिंसक वळण लागून दगडफेक व मालमत्तेच्या नुकसानीचे प्रकार घडले. या प्रकरणी हुल्लडबाजी करणाऱ्या ४०० ते ५०० जणांविरुद्ध विनापरवाना मोर्चा व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन व दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दहा जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी परिस्थिती नियंत्रणात होती. पूर्व व पश्चिम भागात व्यवहार सुरळीत होते. दगडफेकीच्या घटनेतील संशयित आरोपींमध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी पोलीस नियंत्रण कक्षात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.महागाईवरून लक्ष हटवण्यासाठी दंगलीचे कारस्थान - राऊत औरंगाबाद : महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे. फालतू विषयांवर लोकांची दिशाभूल करण्याचे राजकारण असून, महाराष्ट्रात दंगली घडवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे कारस्थान चालू आहे, असा आरोप शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. सरकार पाडण्याच्या तुम्ही कितीही तारखा देत राहा, आमचे सरकार २५ वर्षे राहील, असे ते म्हणाले. महागाईविरोधातील शिवसेनेनेच्या मोर्चाला ते संबोधित करीत होते.विघ्नसंतोषींकडून दंगली घडविण्याचे काम : अजित पवारजाती-धर्माचे राजकारण न करता सर्वांनी एकोप्याने रहावे. हिंसाचारात गरिबांचे नुकसान होते. कोरोना, नैसर्गिक आपत्ती या घटनेला महाविकास आघाडी सरकार यशस्वी तोंड देऊन उभारी घेत असताना काही विघ्नसंतोषी लोकांना ते बघवत नाही. राज्यात दंगली घडविल्या जात आहेत. सर्वानी शांतता राखावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जामखेड (जि. अहमदनगर) येथे केले.