शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

राज्यातील हिंसाचारावरून राजकीय आखाडा तापला; केंद्र-राज्य सरकारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 06:58 IST

राज्यात राजकीय आखाडा तापला असून राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू केली आहे. 

मुंबई : त्रिपुरातील कथित धार्मिक हिंसाचारावरून राज्यात शुक्रवारी बंददरम्यान ज्या हिंसक घटना घडल्या त्याविरोधात राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदवेळी अमरावतीत शनिवारी पुन्हा हिंसाचार होऊन संचारबंदी लावण्यात आली. त्यानंतर राज्यात राजकीय आखाडा तापला असून राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू केली आहे. नांदेडमध्ये तीनशे जणांवर गुन्हे शुक्रवारी नांदेड बंददरम्यान करण्यात आलेल्या दगडफेक व वाहने जाळपोळ प्रकरणात विविध पोलीस ठाण्यांत तीनशे जणांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत तर दहाहून अधिक जणांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड सुरू होती. शहराच्या विविध भागात लावलेले सीसीटिव्ही कॅमेरे, व्हिडीओवरुन आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे. रझा ॲकॅडमीच्या आयोजकांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. 

मालेगावमध्ये दहा अटकेत, ५०० जणांविरुद्ध गुन्हामालेगाव : त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या शुक्रवारच्या बंदला हिंसक वळण लागून दगडफेक व मालमत्तेच्या नुकसानीचे प्रकार घडले. या प्रकरणी हुल्लडबाजी करणाऱ्या ४०० ते ५०० जणांविरुद्ध विनापरवाना मोर्चा व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन व दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दहा जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी परिस्थिती नियंत्रणात होती. पूर्व व पश्चिम भागात व्यवहार सुरळीत होते. दगडफेकीच्या घटनेतील संशयित आरोपींमध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी पोलीस नियंत्रण कक्षात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.महागाईवरून लक्ष हटवण्यासाठी दंगलीचे कारस्थान - राऊत औरंगाबाद : महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे. फालतू विषयांवर लोकांची दिशाभूल करण्याचे राजकारण असून, महाराष्ट्रात दंगली घडवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे कारस्थान चालू आहे, असा आरोप शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. सरकार पाडण्याच्या तुम्ही कितीही तारखा देत राहा, आमचे सरकार २५ वर्षे राहील, असे ते म्हणाले. महागाईविरोधातील शिवसेनेनेच्या मोर्चाला ते संबोधित करीत होते.विघ्नसंतोषींकडून दंगली घडविण्याचे काम : अजित पवारजाती-धर्माचे राजकारण न करता सर्वांनी एकोप्याने रहावे. हिंसाचारात गरिबांचे नुकसान होते. कोरोना, नैसर्गिक आपत्ती या घटनेला महाविकास आघाडी सरकार यशस्वी तोंड देऊन उभारी घेत असताना काही विघ्नसंतोषी लोकांना ते बघवत नाही. राज्यात दंगली घडविल्या जात आहेत. सर्वानी शांतता राखावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जामखेड (जि. अहमदनगर) येथे केले.