शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

राजकीय भूकंप : लातूरच्या महापौर, उपमहापौर, सभापतींचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 22:04 IST

लातूर शहर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपात गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत गटबाजीमुळे धूसफूस सुरू होती.

 

 लातूर - लातूर शहर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपात गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत गटबाजीमुळे धूसफूस सुरू होती. अखेर महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, स्थायी समितीचे सभापती अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे यांचे पक्षाने राजीनामे घेतले आहेत. याशिवाय, तीन स्वीकृत व स्थायी समितीच्या सदस्यांचेही राजीनामे उद्यापर्यंत घेतले जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, आठ दिवसांत नव्या पदाधिकाºयांच्या निवडी होणार असल्याच्या चर्चेला भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी रविवारी दुजोरा दिला.लातूर मनपात वर्षभरापासून सत्ताधा-यांमध्ये ताळमेळ नव्हता. अनेकदा सभागृहातही सदस्यांमध्ये एकमत होत नव्हते. मनपाची सर्वसाधारण सभा असो की स्थायीची बैठक असो, महापौर, स्थायी समितीचे सभापती विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना अनेकदा एकाकी पडत होते. यावरूनच सत्ताधाºयांमध्ये काही तरी धूसफूस सुरू असल्याचे जाणवत होते. काही महिन्यांपूर्वी महापौरांनी बोलाविलेल्या सर्वसाधारण सभेला सत्ताधारी सदस्यच अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांना तांत्रिक कारण सांगून सभा रद्द करावी लागली होती. लातूर मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली होती. शिवाय, परवा झालेल्या सर्वसाधारण सभेतही महापौरांवर विरोधकांनी भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. त्यावेळीही त्यांच्या मदतीला सत्ताधारी सदस्य धावले नाहीत. अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाने राजीनामे घेण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.  महापौर सुरेश पवार मनपा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपात आले होते. त्यांच्या निवडीला भाजपाच्या निष्ठावंतांचा विरोध होता. हा विरोध डावलून पक्षाने त्यांना महापौर केले होते. भाजपात दोन गट झाल्याने विरोधकांनी सभागृहात अनेकदा महापौरांना कोंडीत पकडले. त्यांना निष्क्रिय ठरविण्यासाठी अंतर्गत गटबाजी भोवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.पक्षाच्या आदेशानुसार राजीनामे : शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटीमहापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी रविवारी पक्षाकडे राजीनामे दिले आहेत. त्यांना पक्षाकडून तसे आदेश होते. उद्यापर्यंत स्वीकृत तीन सदस्य व स्थायी समितीचे सदस्य पक्षादेशानुसार राजीनामे देतील, असे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत झाली बैठक... भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे रविवारी लातुरात होते. त्यांच्या उपस्थितीत पक्ष पदाधिकाºयांची बैठक झाली. या बैठकीला मनपाचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या चार दिवसांपासून राजीनामे घ्यायचे, या विषयावर पक्षांतर्गत खलबते सुरू होते. दरम्यान, प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार राजीनामा घेण्याचा निर्णय झाल्याने पदाधिकाºयांनी राजीनामे दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :laturलातूरPoliticsराजकारणBJPभाजपा