शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया रखडलेलीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 15:05 IST

२०१८ पासून भरती झालेली नाही.

ठळक मुद्देप्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा : विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेलाएका महिन्याच्या आत मैदानी चाचणी, लेखी परीक्षा सुरू होत असल्याचा अनुभव अद्यापदेखील भरती प्रक्रिया न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढीस राज्यात सुमारे ८ ते ९ लाख विद्यार्थी राज्यातील विविध शहरांत भरतीसाठी करतात तयारी

प्रशांत ननवरे -  

बारामती : महाराष्ट्र पोलीस भरतीमधील विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेचे अर्ज भरून ५ महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापदेखील भरती प्रक्रिया न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढीस लागली आहे. पोलीस भरती प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सप्टेंबर २०१९ मध्येच पूर्ण झाली आहे. एकूण ३,४५० पोलीस शिपाईपदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. त्याअनुषंगाने अद्यापर्यंत लेखी परीक्षा, मैदानी चाचणी झालेली नाही; त्यामुळे विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. वास्तविक, पोलीस भरतीच्या आजपर्यंतच्या इतिहासात ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर एका महिन्याच्या आत मैदानी चाचणी, लेखी परीक्षा सुरू होत असल्याचा अनुभव आहे. मात्र, या अनुभवाला प्रथमच छेद गेला आहे. ही प्रक्रिया ५ महिन्यांनंतरदेखील ठप्प आहे.याशिवाय, पोलीस भरती प्रक्रिया सुरू करताना मैदानी चाचणी, लेखी परीक्षेचा क्रम अद्याप शासनाने जाहीर केलेला नाही. हा क्रम जाहीर नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. विद्यार्थी अक्षरश: निर्णयाच्या प्रतीक्षेत हवालदिल झाले आहेत. त्या वेळी जाहीर केलेल्या पोलीस भरतीबाबतची जाहिरात महायुती शासनाच्या काळात आॅगस्ट-सप्टेंबर २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या वेळी महापोर्टलनुसार प्रथम आॅनलाईन, त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचा क्रम ठरला होता. मात्र, नवीन आलेल्या महाआघाडी शासनाने महापोर्टल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असणाºया संभ्रमासाठी परीक्षेचा क्रम कारणीभूत ठरत आहे. राज्य शासनाने कोणतेही परिपत्रक काढून भरतीची माहिती देण्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेचा सराव करणे सोपे जाणार आहे.याबाबत येथील सह्याद्री अ‍ॅकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की शासनाने कमी जागांसाठी भरती प्रक्रिया घेतलेली आहे. विद्यार्थ्यांचा संंभ्रम दूर करण्यासाठी शासनाने भरती प्रक्रिया लवकर जाहीर करून भरतीचे स्वरूप स्पष्ट करावे. शासनाने महापोर्टल स्थगित करण्याचा घेतलला निर्णय स्वागतार्ह आहे; मात्र तो निर्णय रद्द केल्यानंतरच विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.  ..........

२०१८ पासून भरती झालेली नाही.भरती प्रक्रिया कधी सुरू होणार, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांनादेखील उत्सुकता आहे. राज्यात सुमारे ८ ते ९ लाख विद्यार्थी राज्यातील विविध शहरांत भरतीसाठी तयारी करीत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासिका लावल्या आहेत. अनेक विद्यार्थी वसतिगृह आणि खासगी ठिकाणी राहून तयारी करीत आहेत. ............2खानावळ, राहणे, तयारी, पुस्तके, अभ्यासाचा विद्यार्थ्यांना किमान प्रत्येकी ४ ते ५ हजार रुपये प्रतिमहिना खर्च येत आहे. त्यातच अजून भरती प्रक्रिया जाहीर झाली नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकही आर्थिक चिंतेत आहेत. राज्यात मार्च २०१८ नंतर पोलीस भरती झालेली नाही. 

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसState Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थी