शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही विमाकवच द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 19:07 IST

समाज आणि प्रशासन यामधील महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलिस पाटलांनाही विमा कवच मिळण्याची नितांत गरज आहे.

मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आरोग्य क्षेत्रात आघाडीवर असलेले देशही या महामारीसमोर हतबल झालेले दिसत आहे. अशा स्थितीत आरोग्य यंत्रणा आणि त्याला समांतर असणाऱ्या पोलिस, शासकीय, निमशासकीय यंत्रणा आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे. यापैकी या यंत्रणातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून विमाकवच देण्यात आले आहे. तसे विमाकवच गावपातळीवर लढा देणाऱ्या पोलिस पाटलांना देखील मिळावे, अशी मागणी माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे.

मोहिते-पाटील यांनी अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या शासकीय, निमशासकीय व सामाजिक पातळीवरील सर्वच घटक आपले कर्तव्य सक्षमपणाने निभावण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. यामध्ये गाव पातळीवरील पोलीस पाटील हा घटकही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय, निम शासकीय व कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या अनेक घटकांना शासनाने विमा कवच दिले आहे. त्याप्रमाणे समाज आणि प्रशासन यामधील महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलिस पाटलांनाही विमाकवच मिळण्याची नितांत गरज आहे. यासाठी आपण आपल्या स्तरावर प्रयत्न करून पोलीस पाटलांना विमाकवच मिळवून द्यावे अशी विनंकी मोहिते पाटील यांनी फडणवीसांकडे केली आहे.