शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

पोलिसांचे चुकलेच, टोरेस फसवणूकप्रकरणी उच्च न्यायालयाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 08:38 IST

Torres Fraud Case: टोरेस गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याच्या कर्तव्यात मुंबई पोलिसांनी कसूर केली, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फटकारले. घोटाळ्याबाबत कोणीही तत्परता दाखविली नाही.

 मुंबई - टोरेस गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याच्या कर्तव्यात मुंबई पोलिसांनी कसूर केली, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फटकारले. घोटाळ्याबाबत कोणीही तत्परता दाखविली नाही. पोलिसांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. सामान्यांनी कष्टाने कमावलेले पैसे गमावण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये, यासाठी तत्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे, असे खंडपीठाने नमूद केले.  

भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी एखादी यंत्रणा आवश्यक आहे, अशी सूचना न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने केली. या कंपनीचा सी.ए. अभिषेक गुप्ता याने पोलिस संरक्षणासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संबंधित कंपनी गुंतवणूकदारांची फसवणूक करत असल्याची माहिती गेल्याच वर्षी आपण पोलिसांना दिली होती, असा दावा गुप्ता यांनी याचिकेत केला आहे. गेल्या आठवड्यात सुनावणीत न्यायालयाने गुप्ताला संरक्षण देण्याचे आणि तपासाची माहिती देण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यानुसार, बुधवारच्या सुनावणीत मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी तपास अहवाल न्यायालयात सादर केला. 

१२ आरोपींपैकी आठ आरोपी ३० डिसेंबर २०२४ रोजी देश सोडून फरार झाले. त्यांपैकी सात युक्रेनचे आणि एक भारतीय आहे. पोलिसांना त्यांची  माहिती मिळाली आहे. योग्य ती कारवाई करण्यात येईल. नवी मुंबई पोलिस ऑक्टोबर २०२४ पासून तपास करत आहेत. त्याशिवाय आर्थिक गुन्हे शाखाही तपास करत आहे. ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि नवघर येथेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वेणेगावकर यांनी दिली. 

३,७०० जणांच्या तक्रारीटोरेसने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. त्यापैकी दोन परदेशी नागरिक आहेत. आतापर्यंत ३,७०० गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. ५७ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

...तर चौकशीसाठी ‘एसआयटी’ नेमा पोलिसांकडे माहिती होती तर त्यांनी तत्काळ कारवाई का केली नाही? कुठेतरी कर्तव्यात कसूर केली आहे. आता भविष्यात असे कधी घडणार नाही, याची हमी द्या. तुम्हाला त्यांची (कंपनी) कार्यपद्धती माहिती आहे. गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने करावा.  गरज असेल तर त्यांनी ‘एसआयटी’ नेमावी, असे नमूद करत न्यायालयाने सुनावणी आठ आठवडे तहकूब केली.

टॅग्स :torres scamटोरेस घोटाळाMumbai High Courtमुंबई हायकोर्टMumbai policeमुंबई पोलीस