शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 13:14 IST

जर पोलिसांनी एक दिवस जरी प्रामाणिक काम केले तर सर्व वाईट गोष्टी संपतील. गुन्हेगारी संपेल. बुलढाण्यात २ पोलिसांची चोरांसोबत पार्टनरशिप होती असा दावा संजय गायकवाड यांनी केला.

बुलढाणा - आपल्या विधानांनी कायम चर्चेत असणारे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महायुती सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. राज्यातील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे करत अप्रत्यक्षपणे आमदार गायकवाड यांनी गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केले आहे. नवा कायदा आला की हफ्ता वाढतो असं वादग्रस्त विधानही आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.

बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारल्यावर संजय गायकवाड म्हणाले की, नवा कायदा आला की पोलिसांचा हफ्ता वाढतो. महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम आहेत. आपला देश वगळता अन्य ठिकाणी इतके अकार्यक्षम पोलीस सापडत नाहीत. गुटखा बंदी केली की यांचा हफ्ता वाढला, दारूबंदी केली की यांचा हफ्ता वाढला असा आरोप त्यांनी केला.

तसेच चोरीचा माल पोलिसांच्या घरात राहायचा. त्यांची नावे सांगणार नाही. जर पोलिसांनी ठरवले १ वर्ष प्रामाणिक काम करेन तर सगळे सुतासारखे सरळ होतील. जर पोलिसांनी एक दिवस जरी प्रामाणिक काम केले तर सर्व वाईट गोष्टी संपतील. गुन्हेगारी संपेल. बुलढाण्यात २ पोलिसांची चोरांसोबत पार्टनरशिप होती. चोराला पकडायला गेले की हे पोलीस त्यांना आधीच इन्फॉर्म करायचे असं आमदार गायकवाड यांनी सांगितले.

कोरोनाकाळात फडणवीसांवर केली होती जहरी टीका

दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी कोरोना काळातही देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली होती. राज्यासह देशभरात कोरोनानं हाहाकार उडाला आहे. पण विरोधी पक्ष मदत करायचे सोडून राजकारण करत आहे. मला जर कोरोना विषाणू मिळाला तर तो देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेन असं विधान संजय गायकवाड यांनी केले होते. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिसEknath Shindeएकनाथ शिंदे