शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

पोलिसांना संघटनेचा अधिकार हवा

By admin | Updated: March 9, 2016 06:16 IST

राज्याच्या पोलीस दलातील सुमारे अडीच लाख कर्मचाऱ्यांना संघटना स्थापन करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी दाखल झालेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालायच्या नागपूर खंडपीठापुढे येत्या

राजेश निस्ताने,  यवतमाळराज्याच्या पोलीस दलातील सुमारे अडीच लाख कर्मचाऱ्यांना संघटना स्थापन करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी दाखल झालेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालायच्या नागपूर खंडपीठापुढे येत्या १७ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्या वेळी महाधिवक्ता श्रीहरी अणे सरकारची बाजू मांडणार आहेत.१९८०च्या दशकापूर्वी राज्यात पोलिसांची संघटना होती. मात्र, त्या संघटनेच्या पुढाकाराने मुंबईत पोलिसांचे ‘बंड’ झाल्यानंतर त्या संघटनेवर बंदी घालण्यात आली आणि पोलिसांची संघटना स्थापनेची दारे बंद झाली.आता नागपूर खंडपीठापुढील सुनावणीच्या निमित्ताने हा विषय पुन्हा ऐरणीवर येणार आहे. नागपूरची ही याचिका आॅगस्ट २०११ पासून प्रलंबित असून, ती सहायक पोलीस निरीक्षक जे.व्ही. पाटील, एम.बी. तोडकर, आर.आर. महाले, यू. एच. साळगावकर व पंकज थोरात यांनी दाखल केली आहे.कोर्टातील तिसरी इनिंग्जपोलिसांनी संघटना स्थापनेच्या हक्कासाठी न्यायालयात दाद मागण्याची ही तिसरी वेळ आहे. १९९७ ला मुंबई उच्च न्यायालयात अखिल भारतीय सेनेचे उपाध्यक्ष जितेंद्र दाभोळकर यांनी पोलीस संघटनेच्या मुद्द्यावर सर्वप्रथम याचिका दाखल केली होती. १९९८ मध्ये मुख्य न्यायाधीश न्या. एम.बी. शहा व न्या. अनिल साखरे यांच्या खंडपीठाने त्यात तत्कालीन पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांना ९० दिवसांत योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश दिले. मात्र, महासंचालकांनी पोलिसांना संघटनेची गरज नाही, त्यांच्या समस्या पोलीस दरबारात सोडविल्या जातात, असे नमूद करीत संघटनेचा मार्ग बंद केला. त्यानंतर, उच्च न्यायालयात दुसरी याचिका जमादार सखाराम यादवडे यांनी दाखल केली. न्या. डी. के. देशमुख व न्या. राजीव यांच्या खंडपीठाने १६ जुलै २००९ रोजी तब्बल ११ वर्षांनी संघटनेला मान्यता दिली. तत्कालीन महासंचालक अनामी रॉय यांच्याकडे आॅगस्ट २००९ रोजी संघटनेसाठी अर्ज सादर केला गेला. दरम्यान, दरबारात समस्या सोडविण्यास आपण राजे-महाराजे आहात काय? अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फटकारले. तेव्हापासून पोलीस दरबाराचे नामकरण ‘वृंद परिषद’ झाले. परिषदेचा आडोसा घेऊन पोलिसांचा अर्ज पुन्हा फेटाळण्यात आला. केंद्र शासनाने भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांना संघटनेचा हक्क दिलेला आहे. त्याच धर्तीवर ‘पोलीस रिक्रिएशन अ‍ॅक्ट, १९६६ नुसार सामान्य पोलिसांनासुद्धा संघटनेचा हक्क दिलेला आहे. या आधीच्या पोलीस संघटनेच्या सन १९८१ मध्ये रीतसर निवडणुका होऊन जिल्हा व राज्यस्तरावर कमिट्या स्थापन झाल्या. पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षक व उपनिरीक्षक ते पोलीस आयुक्त (मपोसे) अशा दोन स्वतंत्र संघटना त्या वेळी स्थापन झाल्या. राज्यस्तरीय कमिटीला मुंबईत भायखळा येथे चार हजार चौरस फुटांचे कार्यालय मिळाले. तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी त्याचे उद्घाटन केले होते. मात्र, कालांतराने मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या कारकिर्दीत पोलीस संघटवेर बंदी घातली गेली.२१ राज्यांत संघटनाआंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, नागालँड, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगण, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान या २१ राज्यांमध्ये पोलिसांच्या संघटना कार्यरत आहेत. आठ राज्यांत प्रतीक्षामहाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझोरम, मेघालय, सिक्कीम आणि उत्तराखंडमध्ये संघटनेची प्रतीक्षा आहे.