शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

पोलीस दलाचा ‘चेहरा’ बदलणार

By admin | Updated: November 4, 2014 01:05 IST

नव्या सरकारच्या राज्याभिषेकाला काही तासांचाच कालावधी झाला असताना राज्य पोलीस दलाचा ‘चेहरा’ बदलण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि अनेक बहुचर्चित

राज्यात नव्या डीजींची चर्चा : संधी कुणाला ?नरेश डोंगरे - नागपूर नव्या सरकारच्या राज्याभिषेकाला काही तासांचाच कालावधी झाला असताना राज्य पोलीस दलाचा ‘चेहरा’ बदलण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि अनेक बहुचर्चित प्रकरणांच्या तपासात पोलीस हतबल ठरल्यामुळेच हा बदल चर्चेला आला आहे.राज्यात गेल्या काही वर्षात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. दोन-तीन वर्षात तिने कळसच गाठला आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या राज्य पोलीस दलाला ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा उलगडा करण्यात एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही यश आलेले नाही. अनेक प्रकरणात पोलीस हतबल ठरल्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाचा नाकर्तेपणा सर्वत्र चर्चेला आला आहे. नवे सरकार राज्य पोलीस दलाला अधिक सक्षम आणि कार्यक्षम करणार असे संकेत असतानाच पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्या बदलीचेही वारे वाहू लागले आहेत. सुमारे दोन वर्षांपासून पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. काही वर्षांपासून राज्यात गुन्हेगारी झपाट्याने वाढली आहे. क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी (२०१३) बिहारपेक्षा जास्त हिंसक गुन्हे महाराष्ट्रात घडले. बिहारमध्ये गेल्यावर्षी एकूण ३०२१३ गुन्हे घडले. तर, महाराष्ट्रात घडलेल्या गुन्ह्यांचा आकडा ३२,८१५ आहे. २०१२ मध्ये ही आकडेवारी क्रमश: २९,८४२ आणि २६,९७१ अशी होती. दलितांवरील अत्याचारातही मोठी वाढ झाली आहे. अगदी ताजी प्रकरणे सांगायची म्हटल्यास अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे हत्याकांड आणि परवा पुण्याजवळ झालेल्या दलित महिलेवरील सामूहिक बलात्काराचे उदाहरण सांगता येते. या एकूणच प्रकारामुळे महाराष्ट्र पोलीस दलाला नवा सेनापती मिळावा, राज्याचे पोलीस दल अधिक सक्षम केले जावे आणि राज्यातील नागरिकांना गुन्हेगारीपासून दिलासा मिळावा, अशी स्वाभाविक अपेक्षा केली जात आहे.संजीव दयाल दयाल यांची प्रतिमा स्वच्छ (नॉनकरप्ट) आहे. मात्र, काही विशिष्ट अधिकाऱ्यांवरच त्यांची मेहरनजर असल्याचा पोलीस दलात सूर आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक चांगल्या अधिकाऱ्यांवर विशेषत: मपोसे आणि मराठी अधिकाऱ्यांवर नाहकच दयाल यांच्याकडून अप्रत्यक्ष अन्याय झाल्याचेही बोलले जाते. नागपुरातील धंतोली ठाण्यात दयाल यांच्याविरोधात गेल्या वर्षी ‘अ‍ॅट्रोसिटी’अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. डीजी असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात चर्चेला उधाण आले होते.प्रवीण दीक्षितस्वच्छ प्रतिमेचे धनी असलेले प्रवीण दीक्षित रिझल्ट ओरिएन्टेड म्हणूनही ओळखले जातात. ‘जेथे जातील, तेथे करून दाखवतील’, अशीही त्यांची ख्याती आहे. सध्या ते डीजी अ‍ॅन्टीकरप्शन म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. भ्रष्टाचाऱ्यांच्या मुसक्या बांधण्याचा सपाटाच महाराष्ट्रात लागला आहे. त्यांनीच महिनाभरापूर्वी भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन (टोल फ्री नंबर) सुरू करून भ्रष्टाचाऱ्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. नागपुरात पोलीस आयुक्त म्हणून सेवारत असताना ते २४ तास आॅनड्युटी असायचे. पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी ते रात्री- बेरात्री स्वत:च बाहेर पडून ‘पेट्रोलिंग‘ चेक करायचे. ड्रंकन ड्राईव्ह सुरू करून त्यांनी पोलिसांच्या तिजोरीत घसघशीत गंगाजळी भरली होती.