काळजाला भिडते सुर्वेची कविता

By Admin | Updated: August 20, 2014 00:20 IST2014-08-20T00:20:01+5:302014-08-20T00:20:01+5:30

सहजपणाने काळजाला भिडणारी नारायण सुर्वेची कविता आहे. ती सरळ आणि साधी आहे. दु:खितांचे, कष्टितांचे प्रतिनिधित्व करते.

Poem about Survey | काळजाला भिडते सुर्वेची कविता

काळजाला भिडते सुर्वेची कविता

ना. धों. महानोर : नारायण सुव्रे काव्यजागर संमेलन
पिंपरी : सहजपणाने काळजाला भिडणारी नारायण सुर्वेची कविता आहे. ती सरळ आणि साधी आहे. दु:खितांचे, कष्टितांचे प्रतिनिधित्व करते. समाजवाद आणि साम्यवाद त्यातून व्यक्त होतो. अशा मित्रच्या नावाचा पुरस्कार मिळाला, हा माङया दृष्टीने परमोच्च आनंदाचा क्षण आहे, असे भावोद्गार कविवर्य ना. धों. महानोर यांनी चिंचवड येथे काढले.
नारायण सुव्रे साहित्य कला अकादमीच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित नारायण सुव्रे काव्यजागर संमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे, माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, चित्रपट दिग्दर्शक नागनाथ मंजुळे, रवींद्र जैन, पुरुषोत्तम सदाफुले, कैलास आवटे, बाजीराव सातपुते, सुव्रे यांची कन्या कल्पना घारे आदी उपस्थित होते. भाई वैद्य यांच्या हस्ते महानोर यांना नारायण सुव्रे स्नेहबंध पुरस्कार, मंजुळे यांना काव्यप्रतिभा पुरस्कार, जैन यांना साहित्ययात्री पुरस्कार, ज्ञानदीप विद्यालयास प्रगतिशील शिक्षण संस्था पुरस्कार देऊन सन्मानित केले.   
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सामान्यांतल्या सामान्य माणसाला आपला वाटणारा कवी म्हणजे सुव्रे होत. कष्टक:यांचे भावविश्व त्यांच्या कवितेत होते. सुव्रे, महानोर, करंदीकर, पाडगावकर यांच्या कविता ऐकून, वाचून आम्ही मोठे झालो. आज लोक वाचत नाहीत, हे वास्तव आहे. अभिव्यक्तीला वाट न मिळाल्याने सामाजिक प्रश्न निर्माण होतात. 
मंजुळे म्हणाले, ‘‘मी कविता लिहितो. पण ती सादर करण्याची भीती वाटते. कवितेसाठी सुव्रे यांच्या नावाचा पुरस्कार मिळणो ही माङया दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. आज सुव्रे आपल्यात नाहीत यावर माझा विश्वासच बसत नाहीत. कारण कवी, कलावंत हा त्याच्या कलाकृतीच्या निमित्ताने सदैव आपल्यासोबत असतो.’’ त्यांनी मित्र, अ आणि ब ही कविता सादर करून दाद घेतली. (प्रतिनिधी)
 
मानसिकता चुकीची
साहित्यिक, कवींच्या मानसिकतेविषयी महानोर आणि कोत्तापल्ले यांनी भाष्य केले. महानोर म्हणाले, ‘‘दुस:यांना प्रतिभावंत म्हणण्याची मानसिकता नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. चांगल्याचे कौतुक करण्याची मानसिकता वाढीला लागायला हवी. पुस्तके वाचण्यापेक्षा माणसे वाचायला हवीत. माणसे वाचणारा, साहित्यावर प्रेम करणारा कवी सुव्रे होते. त्यांचे निस्सीम प्रेम तराजूत मोजणो कठीण आहे.’’ नवकवींबाबत कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘नवकवी व्यासपीठावर यायला लागला की, त्याच्या नरडीला नख कसे लावता येईल, याचा विचार सिनियर करीत असतात. हे चुकीचे आहे. आज सादर झालेल्या कविता खरोखरच चिंतनशील आहेत.’’
 

 

Web Title: Poem about Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.