शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

संभाजी भिडे गुरुजींना 8 दिवसांत अटक करा, अन्यथा...- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 16:40 IST

संभाजी भिडे गुरुजींना आठ दिवसांत अटक करा, अन्यथा सरकारनं याचे गंभीर परिणाम भोगायला तयार राहावे, असा इशारा आज भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.

मुंबई- संभाजी भिडे गुरुजींना आठ दिवसांत अटक करा, अन्यथा सरकारनं याचे गंभीर परिणाम भोगायला तयार राहावे, असा इशारा आज भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. एल्गार रॅलीच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी संभाजी भिडे गुरुजींना पाठीशी घालत आहेत. सरकारनं कोर्टाचं काम करू नये, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघानं एल्गार मोर्चा काढला होता. त्या एल्गार मोर्चाला आंबेडकरी जनतेनं चांगला प्रतिसाद दिला. जिजामाता उद्यान ते विधान भवनदरम्यान काढण्यात आला असून, भारिप बहुजन महासंघाच्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तर दुसरीकडे आझाद मैदानावरील आंदोलनास पोलिसांकडून मंजुरी देण्यात आली होती. प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना अल्टिमेटमही दिला आहे. भिडेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींना फूस आहे की भिडे मोदींना फूस लावतायत हे पाहावं लागेल. संभाजी भिडे आरोपी नंबर एक आहेत एकबोटे आरोपी नंबर दोन आहेत. आरोपी 2 वर कारवाई होते तर आरोपी एकवर का नाही ?, असा प्रश्नही आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. भिडे यांना अटक करायची असेल तर रावसाहेब पाटील यांची पोस्ट आहेच. त्यावर मुख्यमंत्र्यांना मारून टाका असं लिहिलं होतं. त्यावर संभाजी भिडेंचा फोटो होता. रावसाहेब पाटील यांना अटक करा त्यांच्यापासून भिडेंपर्यंत पोहोचता येईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. 

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर