शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

स्वातंत्र्यवीर सावरकरांना खलनायक ठरवण्याचा नियोजित कट, Sanjay Raut यांचं रोखठोक मत, Rajnath Singh यांनाही सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 08:59 IST

Swatantryaveer Savarkar: सावरकरांच्या द्वेषातून एक नपुंसक पिढी पोसली गेली. त्याउलट सावरकरांच्या प्रेरणेतून अनेक लढवय्ये निर्माण झाले. सावरकरांना सातत्याने खलनायक ठरवण्याचे प्रयत्न झाले. मात्र प्रखर हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्तांसाठी ते नायकच आहेत, अशी रोखठोक भूमिका Sanjay Raut यांनी मांडली आहे.

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधीच्या सल्ल्यानुसार माफी मागितली होती असे विधान काही दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले होते. तेव्हापासून राजकीय वर्तुळात सावरकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानकारक उदगार काढणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. सावरकरांच्या द्वेषातून एक नपुंसक पिढी पोसली गेली. त्याउलट सावरकरांच्या प्रेरणेतून अनेक लढवय्ये निर्माण झाले. सावरकरांना सातत्याने खलनायक ठरवण्याचे प्रयत्न झाले. मात्र प्रखर हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्तांसाठी ते नायकच आहेत, अशी रोखठोक भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.

या लेखात संजय राऊत लिहितात की, विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते. स्वातंत्र्यापूर्वी त्यांना परकीयांनी छळले आणि आज स्वकीय त्यांचा छळ करत आहेत. सावरकरांचे उत्तुंग क्रांतिकार्य, देशासाठी त्यांनी केलेला त्याग विसरून काही लोक सावरकरांना माफी मागून सुटलेला वीर अशी संभावना करत असतात. हा एक कट आहे. गांधीजींच्या सांगण्यावरून सावरकरांनी माफी मागितली, असे संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. यावरून वादळ निर्माण झाले. सावरकरांच्या चारित्र्यहननाचे नवे उद्योग सुरू झाले. सावरकरांनी आपल्या क्रांतिपर्वात माफी मागण्याशिवाय काहीच केले नाही, असे काही लोकांना वाटते. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अंगावर एक चटोराही मारून घेतला नाही, असे लोक सावरकरांचा उल्लेख माफीवीर असा करतात. मात्र सावरकरांसारख्या क्रांतिकारकांनी ब्रिटीश साम्राज्याविरोधात क्रांतिकारकांची फौज तयार केली.

सावरकरांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या होत्या. ते काळेपाणीच होते. या शिक्षा पूर्ण भोगल्या असत्या तर ते २३ डिसेंबर १९६० रोजी पन्नास वर्षे झाल्यावर त्यांची सुटका झाली असती. अंदमानच्या अंधाऱ्या गुहेत खितपत पडत मरण्यापेक्षा युक्तीने बाहेर पडावे, मग देशसेवेत मग्न व्हावे, हा विचार सावरकरांनी केला. सावरकरांनी वेळोवेळी केलेले अर्ज, त्यामागचा राजकीय संदर्भ आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी त्यासंबंधी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहता तुरुंगातून सुटण्यासाठी तात्या एक चाल खेळत होते, हे लक्षात येते, असे संजय राऊत यांनी सांगितले.

गांधीजींच्या विरोधात सावरकरांना उभे करून विषाचे प्रवाह निर्माण केले गेले. आज काही लोक महात्मा गांधींना मानायला तयार नाहीत. गांधींच्या तुलनेत सरदार पटेल उंच, महान असल्याचे दाखवून नवे राजकारण करत आहेत. सावरकरांनाही त्याच मार्गावरून जावे लागले. सावरकरांवर चिखलफेक सदैव झाली. यापुढेही सुरूच राहील. मात्र सावरकरांच्या प्रतिष्ठेचा बालही बाका होणार नाही. 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत