शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

डाळ उत्पादकांसाठी योजना

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

डाळ उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक असला तरी गेल्या दहा वर्षांत देशांतर्गत डाळ उत्पादनात कमालीची घट झाली आहे. उत्पादनाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने डाळींचा

मुंबई : डाळ उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक असला तरी गेल्या दहा वर्षांत देशांतर्गत डाळ उत्पादनात कमालीची घट झाली आहे. उत्पादनाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने डाळींचा तुटवडा निर्माण होतो. डाळ उत्पादनातील तूट भरून काढण्यासाठी डाळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. डाळींच्या उत्पादनात आणि वापरातही आपला अव्वल क्रमांक लागतो. आपल्याकडील डाळीची चव जगात सर्वोत्तम आहे. त्यामुळे अनेकदा आयात डाळीबाबत ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे आपल्याकडे डाळी पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्य सरकारने प्रोत्साहन योजना आणायचे ठरविले आहे. त्याअंतर्गत डाळींचे बी-बियाणे स्वस्त दरात उपलब्ध करून देणे, उत्पादकांना डाळींसाठी जादा दर देण्याच्या उपाययोजनांचा समावेश आहे. रेशन दुकानांच्या माध्यमातून तूरडाळ वितरित करण्याबाबत कृषी व पणन विभागाची बैठक झाली. तसे झाल्यास प्रत्येक कुटुंबाला स्वस्तात तूरडाळ मिंळणे शक्य आहे. मात्र, अद्याप याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.दर नियंत्रणासाठी कायदा आणणारडाळींचे वाढते दर नियंत्रित ठेवण्यासाठी लवकरच दर नियंत्रण कायदा तयार करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची लेखी माहिती मंत्री बापट यांनी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांसह बारा विरोधी सदस्यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता.भविष्यात तूर, तूरडाळ, खाद्यतेल, खाद्यतेल बिया व इतर कडधान्यांच्या वाढत्या किमती नियंत्रित करण्यासाठी कृती आराखडा तयार केला असून दर नियंत्रक समितीही स्थापन करण्यात आल्याचे बापट यांनी सांगितले.