शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नववर्षाच्या उत्साहात गुलाबी थंडीची भर; अहमदनगरमध्ये सर्वाधिक तापमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 01:40 IST

मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १४.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ४.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

मुंबई/पुणे : मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १४.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ४.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईसह राज्यातील गारवा कायम असून, २ जानेवारी रोजीही मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील थंडीची लाट कायम राहणार आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.मुंबई आणि आसपाच्या परिसराचा विचार करता २ आणि ३ जानेवारी रोजी आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, १६ अंश नोंदविण्यात येईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.सध्या उत्तर प्रदेश, हरियाना, चंडीगड, दिल्ली, पंजाब, पूर्व मध्य प्रदेश, आणि तेलंगणा येथे तुरळक ठिकाणी थंडीची लाट आली आहे़ भटिंडा येथे सर्वात कमी तापमान ०़७ अंश से. नोंद झाली आहे़राज्यात थंडीचे दोन बळीसातारा आणि जळगावात थंडीमुळे प्रत्येकी एक असा दोघांचा बळी गेला. सातारा जिल्ह्यातील विवर (ता. जावळी) येथील शामराव लक्ष्मण गोळे (वय ६५) यांचा गारठ्याने मृत्यू झाला. तर जळगाव शहरानजीक एका फिरस्त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :weatherहवामान