शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल दरवाढीने बिघडले सामान्यांचे बजेट; बसभाडेही महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 06:00 IST

पेट्रोल व डिझेलच्या दराने सोमवारी नवा उच्चांक गाठला. राज्याच्या अनेक भागांत पेट्रोल ८७ रुपये २३ डिझेल ७५.७० रुपयांवर पोहोचले. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे.

मुंबई : पेट्रोल व डिझेलच्या दराने सोमवारी नवा उच्चांक गाठला. राज्याच्या अनेक भागांत पेट्रोल ८७ रुपये २३ डिझेल ७५.७० रुपयांवर पोहोचले. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे. धान्ये, खाद्यान्न, भाजीपाला, प्रवास सारेच महागल्याने सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडण्याची भीती आहे.तिन्ही तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात ३१ व डिझेलच्या दरात ३९ पैसे प्रति लीटरची वाढ केली. सलग १0 दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरू आहे. खाद्यान्न, धान्य, भाजीपाला यांची वाहतूक डिझेलच्या वाहनाने होत असते. ही वाहतूक करणाऱ्या मालवाहतूकदारांनी डिझेल ६८ रुपये प्रति लीटरवर असताना मालभाड्याचा दर निश्चित केला होता. डिझेल ७४ रुपये होईपर्यंत आम्ही सहन करू, पण त्यानंतर भाडेदरात वाढीचा विचार करावा लागेल, असे मालवाहतूकदारांनी ‘लोकमत’ला सांगितले होते.आता तर डिझेलने ७५ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे मिनी टेम्पोसाठी मालवाहतूकदार प्रति किमी ५ रुपयांची दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. या मिनी टेम्पोद्वारे मुख्यत: भाजीपाल्याची वाहतूक होते. त्यामुळे भाजीपाला किलोमागे किमान ६ ते ८ रुपये किलोने महागेल.महाराष्टÑात डाळी वगळता, गहू, तांदूळ व तेल या धान्यांची आवक अन्य राज्यांतून होते. सुमारे ५०० ते ८०० किमी किंवा त्याहून अधिक अंतरावरून येणाºया या ट्रक्सच्या वाहतूक खर्चात डिझेल दरवाढीमुळे प्रति फेरी किमान २५०० ते ३००० रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रक वाहतूकदारही भाडेदर वाढवतील आणि त्यामीळे धान्ये व किराण्याच्या किमती किलोमागे १० ते १२ रुपयांनी भडकतील.ड्रायव्हर्सच्या नोक-या संकटातशहरी व निमशहरी भागांत बहुतांश खासगी वाहने डिझेलवरील आहेत. दरवाढीमुळे वाहनमालकांनी गाड्या बाहेर न काढण्याचा निर्णय घेतल्यास ड्रायव्हरच्या नोकºया धोक्यात येण्याची भीती आहे.दुचाकीस्वारांना १३० कोटींचा भुर्दंडराज्यात रोज जवळपास दीड कोटी लिटर पेट्रोलची विक्री होते. त्यापैकी ८० टक्के पेट्रोल दुचाकीसाठी वापरले होते. महिनाभरातील पेट्रोल दरवाढीचा विचार केल्यास दुचाकीस्वारांच्या खिशाला किमान १३० कोटींचा भुर्दंड बसला आहे.बसभाडेही महागणारगणेशोत्सवासाठी अनेक जण गावी जातात. रेल्वेगाड्यांना गर्दी असल्याने ते लक्झरी बसेसचा आसरा घेतात. या बसगाड्या डिझेलवर धावतात. डिझेल दरवाढीमुळे बसगाड्यांच्या खर्चात प्रति किमी ७० ते ९० रुपये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम तिकीटदरांवर होईल. कोकणात जाणाºयांना गणोशोत्सवाच्या काळात एका तिकिटासाठी दोन हजारांवर रुपये मोजावे लागतील.

टॅग्स :Petrolपेट्रोलMaharashtraमहाराष्ट्र