शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

तुमची दिशा चुकतेय, ओबीसी आरक्षण टिकवायचं असेल तर...; मूळ याचिकाकर्त्याने अजितदादांना भेटून दाखवल्या उणिवा

By यदू जोशी | Updated: May 20, 2022 13:58 IST

obc reservation: मूळ याचिकाकर्ते विकास किसनराव गवळी यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.

>> यदु जोशी

मुंबई -

ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या इम्पिरिकल डाटा गोळा करीत असलेल्या जयंतकुमार बांठिया आयोगाने डाटा तयार करण्यासंदर्भात वेळीच काही खबरदारी घेतल्या नाहीत, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन केले नाही तर हा डाटा सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, या शब्दात संपूर्ण प्रकरणातील मूळ याचिकाकर्ते विकास किसनराव गवळी यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. गवळी यांनी बांठिया आयोगाला दिलेल्या निवेदनात या बाबतची सविस्तर माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीदेखील त्यांनी भेट घेतली व डाटा जमा करण्याची दिशा चुकत असल्याचे निदर्शनास आणून दिले. मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करून डाटा बनविला आणि ओबीसी आरक्षण टिकविले हा अनुभव ताजा असताना आता गवळी यांच्या निवेदनावर राज्य सरकार आणि बांठिया आयोग काय कार्यवाही करणार या बाबत उत्सुकता आहे.

काय म्हणाले गवळी?

- बांठिया आयोग नेमण्यासाठीची जी अधिसूचना राज्य सरकारने काढली त्यात अनेक त्रुटी आहेत. आयोगाच्या कार्यकक्षेत अनेक त्रुटी आहेत. त्या दूर न करता आयोगाने अहवाल दिला तर तो न्यायालयात टिकणार नाही.

- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ज्या ओबीसींना आरक्षण द्यावयाचे आहे त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय मागासलेपण सिद्ध करणे आवश्यक आहे. आयोगाच्या कार्यकक्षेमध्ये त्या विषयीचा कोणताही उल्लेख नाही. या समर्पित आयोगामध्ये सदस्य म्हणून कोणत्याही समाजशास्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञाची नियुक्ती केलेली नाही. राजकीय अनुभवी व्यक्तीदेखील नाही. त्यामुळे आयोगाने मांडलेले मागासलेपणाचे निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयात ग्राह्य धरले जाणार नाहीत.

- ओबीसींचा इम्पिरिकल डाटा तयार करून त्यांची गाव, गण, गट, वॉर्ड, प्रभागनिहाय लोकसंख्या, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय मागासलेपणा दर्शवूनच ओबीसी आरक्षणाची शिफारस करा, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.

- संशोधन शास्त्राच्या नियमाप्रमाणे अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करण्यासाठी जी शास्त्रशुद्ध पद्धत विहित केलेली आहे त्या पद्धतीचे आयोगाकडून पालन होताना दिसत नाही.

- ओबीसींच्या लोकसंख्येची तुलना अनुसूचित जाती-जमातींबरोबर करून मगच ओबीसी लोकसंख्या निश्चित करावी व त्या आधारे आरक्षण नक्की करावे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलेले आहे. परंतु आयोगाच्या कार्यकक्षेत त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे आयोगाच्या शिफारशी न्यायालयात टिकणार नाहीत.

- ग्रामीण भागात गाव, तालुका, जिल्हानिहाय तसेच नागरी भागात महापालिका, नगरपालिकांमध्ये वॉर्डनिहाय ओबीसींचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण निश्चित करणेदेखील तितकेच आवश्यक आहे.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस