शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

'व्यक्तिपूजा ही हुकूमशाहीकडे नेणारी'; जयंत पाटलांनी विधानसभेत व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 20:50 IST

Jayant Patil News: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात संविधानावर चर्चा झाली. या विषयावर बोलताना जयंत पाटलांनी काही मुद्दे उपस्थित करत चिंता व्यक्त केली. 

Jayant Patil: 'घटनात्मक यंत्रणांनी राजकीय पक्षाचे गुलाम होणं अपेक्षित नाही. पण अलीकडे दोन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रिटायर झाल्यानंतर एका राजकीय पक्षाचे सदस्य झाले. हे राज्यघटनेसमोरील नवीन चॅलेंज आहे', अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. जयंत पाटली यांनी इतर मुद्द्यांकडेही सभागृहाचे आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जयंत पाटील म्हणाले, "या सभागृहात विविध विचारसरणीची लोकं बसली आहेत, मात्र भारताच्या संविधानाविषयी सर्वांचे एकमत आहे. राज्यघटना बदलण्याची विविध वक्तव्ये काही लोकांनी मागील काळात केली. एका प्रदीर्घ काळानंतर संविधानाची चिकित्सा करणे तितकेच महत्वाचे आहे."

राज्यघटना हा भारताचा आत्मा

"स्वातंत्र्यानंतर भारत जास्त काळा एकसंघ राहणार नाही, असे भाकित अनेकांनी केले. तरीही आज ताठ मानेने आमचा देश उभा आहे. नित्य नियमाने पंचवार्षिक निवडणुका होत आहेत. सत्तांतर होत आहेत. लोकांनी कधी कायदा हातात घेतला नाही. हे आपल्या राज्यघटनेचं महत्व आहे. राज्यघटना ही भारताचा आत्मा आहे. त्यामुळेच इथे विविध जाती, धर्म, भाषेची लोकं एकत्र नांदत आहेत", असे भाष्य जयंत पाटील यांनी केले.

हेही वाचा >>"आजही माझ्या डोळ्यात पाणी अन् अंगावर काटे उभे राहतात.."; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले? 

"सर्वोच्च न्यायालय हे राज्यघटनेचे संरक्षक आहे. घटनेत नमूद केलेला मूलभूत अधिकारांमुळे आपण आदर्श जीवन जगत आहोत. हजारो वर्षांपूर्वीपासून असलेली बरं व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखणीने बदलली. सर्वांना समान अधिकार मिळावे या दृष्टीने आरक्षणाचा जन्म झाला. कलम १७ हा दलितांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. कलम २१ नुसार कोणाचे स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही", असे जयंत पाटील विधानसभेत बोलताना म्हणाले.

"लोकभावना डावलून कसाबला कायद्याच्या चौकटीत राहूनच फाशी देण्यात आली. घटनेने धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. उत्तम संविधानांसोबतच त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा देखील उत्तम असावी लागते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच संविधानाची पाळेमुळे तळागाळात गेली", असे मत जयंत पाटलांनी व्यक्त केले. 

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांबद्दल चिंता

"तीन - तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच झालेल्या नाहीत. राज्यातील लोकशाहीचा खेळ सुरू आहे. घटनात्मक यंत्रणा हा सर्व खेळ पाहत बसली आहे. आजकाल व्यक्तिपूजक भक्तीपंथ मोठ्या प्रमाणावर उदयाला आले आहेत. व्यक्तिपूजा ही हुकूमशाहीकडे नेणारी आहे. अलीकडे पंडित नेहरूंना विविध कारणांनी दोष देण्याचे काम सुरू आहे", अशी उपरोधिक टीका जयंत पाटलांनी भाजपवर केली.  

"महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल ही आधुनिक भारताची दैवतं आहेत. घटना समितीत विविध विचारसरणीचे नेतृत्व होते. घटना विवेकनिष्ठ राहून व्यक्तिकेंद्री न करण्याचा घटनाकारांचा प्रयत्न होता. संविधानाची नैतिकता महत्वाचे आहे", असे ते म्हणाले. 

निवडणूक आयोगाने त्याला केराची टोपली दाखवली -जयंत पाटील

"ग्रामसभा ही सर्वोच्च सभा असते. मर्कडवाडीला वाढीत सुरू असलेल्या ग्राभेला पोलिसांनी बंदी आणली. ग्रामसभेने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा ठराव केला. निवडणूक आयोगाने त्याला केराची टोपली दाखवली. नागरिकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. हे सर्व राज्यघटनेला अभिप्रेत नाही", अशी टीका जयंत पाटलांनी केली. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलvidhan sabhaविधानसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार