शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

'व्यक्तिपूजा ही हुकूमशाहीकडे नेणारी'; जयंत पाटलांनी विधानसभेत व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 20:50 IST

Jayant Patil News: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात संविधानावर चर्चा झाली. या विषयावर बोलताना जयंत पाटलांनी काही मुद्दे उपस्थित करत चिंता व्यक्त केली. 

Jayant Patil: 'घटनात्मक यंत्रणांनी राजकीय पक्षाचे गुलाम होणं अपेक्षित नाही. पण अलीकडे दोन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रिटायर झाल्यानंतर एका राजकीय पक्षाचे सदस्य झाले. हे राज्यघटनेसमोरील नवीन चॅलेंज आहे', अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. जयंत पाटली यांनी इतर मुद्द्यांकडेही सभागृहाचे आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जयंत पाटील म्हणाले, "या सभागृहात विविध विचारसरणीची लोकं बसली आहेत, मात्र भारताच्या संविधानाविषयी सर्वांचे एकमत आहे. राज्यघटना बदलण्याची विविध वक्तव्ये काही लोकांनी मागील काळात केली. एका प्रदीर्घ काळानंतर संविधानाची चिकित्सा करणे तितकेच महत्वाचे आहे."

राज्यघटना हा भारताचा आत्मा

"स्वातंत्र्यानंतर भारत जास्त काळा एकसंघ राहणार नाही, असे भाकित अनेकांनी केले. तरीही आज ताठ मानेने आमचा देश उभा आहे. नित्य नियमाने पंचवार्षिक निवडणुका होत आहेत. सत्तांतर होत आहेत. लोकांनी कधी कायदा हातात घेतला नाही. हे आपल्या राज्यघटनेचं महत्व आहे. राज्यघटना ही भारताचा आत्मा आहे. त्यामुळेच इथे विविध जाती, धर्म, भाषेची लोकं एकत्र नांदत आहेत", असे भाष्य जयंत पाटील यांनी केले.

हेही वाचा >>"आजही माझ्या डोळ्यात पाणी अन् अंगावर काटे उभे राहतात.."; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले? 

"सर्वोच्च न्यायालय हे राज्यघटनेचे संरक्षक आहे. घटनेत नमूद केलेला मूलभूत अधिकारांमुळे आपण आदर्श जीवन जगत आहोत. हजारो वर्षांपूर्वीपासून असलेली बरं व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखणीने बदलली. सर्वांना समान अधिकार मिळावे या दृष्टीने आरक्षणाचा जन्म झाला. कलम १७ हा दलितांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. कलम २१ नुसार कोणाचे स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही", असे जयंत पाटील विधानसभेत बोलताना म्हणाले.

"लोकभावना डावलून कसाबला कायद्याच्या चौकटीत राहूनच फाशी देण्यात आली. घटनेने धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. उत्तम संविधानांसोबतच त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा देखील उत्तम असावी लागते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच संविधानाची पाळेमुळे तळागाळात गेली", असे मत जयंत पाटलांनी व्यक्त केले. 

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांबद्दल चिंता

"तीन - तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच झालेल्या नाहीत. राज्यातील लोकशाहीचा खेळ सुरू आहे. घटनात्मक यंत्रणा हा सर्व खेळ पाहत बसली आहे. आजकाल व्यक्तिपूजक भक्तीपंथ मोठ्या प्रमाणावर उदयाला आले आहेत. व्यक्तिपूजा ही हुकूमशाहीकडे नेणारी आहे. अलीकडे पंडित नेहरूंना विविध कारणांनी दोष देण्याचे काम सुरू आहे", अशी उपरोधिक टीका जयंत पाटलांनी भाजपवर केली.  

"महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल ही आधुनिक भारताची दैवतं आहेत. घटना समितीत विविध विचारसरणीचे नेतृत्व होते. घटना विवेकनिष्ठ राहून व्यक्तिकेंद्री न करण्याचा घटनाकारांचा प्रयत्न होता. संविधानाची नैतिकता महत्वाचे आहे", असे ते म्हणाले. 

निवडणूक आयोगाने त्याला केराची टोपली दाखवली -जयंत पाटील

"ग्रामसभा ही सर्वोच्च सभा असते. मर्कडवाडीला वाढीत सुरू असलेल्या ग्राभेला पोलिसांनी बंदी आणली. ग्रामसभेने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा ठराव केला. निवडणूक आयोगाने त्याला केराची टोपली दाखवली. नागरिकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. हे सर्व राज्यघटनेला अभिप्रेत नाही", अशी टीका जयंत पाटलांनी केली. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलvidhan sabhaविधानसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार