शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कदाचित दिवाळीविषयीची ही माहिती तुम्हाला माहित नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 13:22 IST

परंपरांनुसार आपण वर्षानुवर्षे दिवाळी साजरी तर करतोच पण त्य़ामागचे कारण तुम्हाला माहित आहे का?

ठळक मुद्देदिवाळी साजरी करण्यामागे अनेक अख्यायिका सांगितल्या जातात.काळानुरुप दिवाळीचे स्वरुप बदलत गेले तसतशी दिवाळी साजरी करण्याची पध्दतही बदलत गेली.अशा काही कथा आणि दिवाळी साजरी करण्याच्या पद्धती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दिवाळी साजरी करण्यामागे अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. या सणाच्या अनेक कथाही सांगितल्या जातात. त्यापैकी नरकासुराची कथा फार प्रचलित आहे. काळानुरुप दिवाळीचे स्वरुप बदलत गेले तसतशी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिवाळीची माहिती देताना त्यात अनेक बदल होत गेले. अशाच काही कथा आणि दिवाळी साजरी करण्याच्या पद्धती  आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. देवी महाकालीच्या राज्यात राक्षसांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे देवी महाकालीने या राक्षसांचा वध केली. मात्र तरीही महाकालीचा क्रोध काही कमी झाला नाही. तेव्हा भगवान शंकराने देवीला लोटांगण घातले. यामुळे महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे.

२. बळीराजाने पराक्रम करून त्रौलोक्यावर विजय मिळविला होता. त्यामुळे राज्यातील इतर देव भयभीत झाले. त्यांनी भगवान विष्णुची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायांत दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य घेतले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य देवून भू- लोकवासी त्याच्या आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले.

३. इसवी सन पूर्व ५०० वर्षांपूर्वी वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जायची. मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीची पूजा करून दिवाळी साजरी केली जायची. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जाळले जायचे.

४. इसवी सन पूर्व २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून ‍दिवाळी साजरी केली होती.

५. अश्विन महिन्यातच सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या राज्याभिषेकाप्रित्यर्थ दिवाळी साजरी केली.

६. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि नदी किनारी मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात असल्याचे सांगितले जाते.

७. मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यासमोर ४० गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकविला जात असे. यावेळी बादशहा देखील दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करत असे.

८. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादुरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असत.

९. शहा आलम दुसरा याच्या काळात संपूर्ण शाही महाल दिव्यांनी सजविला जात असे आणि लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुसलमान सहभागी होत असत.

१०. दिवाळी हा ख्रिसमसनंतरचा दुसरा असा सण आहे जो जगभरात विविध देशात भारतीय लोकांकडून साजरा केला जातो.

टॅग्स :Indian Traditionsभारतीय परंपराIndian Festivalsभारतीय सण