शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

कदाचित दिवाळीविषयीची ही माहिती तुम्हाला माहित नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 13:22 IST

परंपरांनुसार आपण वर्षानुवर्षे दिवाळी साजरी तर करतोच पण त्य़ामागचे कारण तुम्हाला माहित आहे का?

ठळक मुद्देदिवाळी साजरी करण्यामागे अनेक अख्यायिका सांगितल्या जातात.काळानुरुप दिवाळीचे स्वरुप बदलत गेले तसतशी दिवाळी साजरी करण्याची पध्दतही बदलत गेली.अशा काही कथा आणि दिवाळी साजरी करण्याच्या पद्धती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दिवाळी साजरी करण्यामागे अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. या सणाच्या अनेक कथाही सांगितल्या जातात. त्यापैकी नरकासुराची कथा फार प्रचलित आहे. काळानुरुप दिवाळीचे स्वरुप बदलत गेले तसतशी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिवाळीची माहिती देताना त्यात अनेक बदल होत गेले. अशाच काही कथा आणि दिवाळी साजरी करण्याच्या पद्धती  आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. देवी महाकालीच्या राज्यात राक्षसांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे देवी महाकालीने या राक्षसांचा वध केली. मात्र तरीही महाकालीचा क्रोध काही कमी झाला नाही. तेव्हा भगवान शंकराने देवीला लोटांगण घातले. यामुळे महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे.

२. बळीराजाने पराक्रम करून त्रौलोक्यावर विजय मिळविला होता. त्यामुळे राज्यातील इतर देव भयभीत झाले. त्यांनी भगवान विष्णुची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायांत दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य घेतले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य देवून भू- लोकवासी त्याच्या आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले.

३. इसवी सन पूर्व ५०० वर्षांपूर्वी वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जायची. मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीची पूजा करून दिवाळी साजरी केली जायची. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जाळले जायचे.

४. इसवी सन पूर्व २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून ‍दिवाळी साजरी केली होती.

५. अश्विन महिन्यातच सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या राज्याभिषेकाप्रित्यर्थ दिवाळी साजरी केली.

६. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि नदी किनारी मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात असल्याचे सांगितले जाते.

७. मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यासमोर ४० गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकविला जात असे. यावेळी बादशहा देखील दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करत असे.

८. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादुरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असत.

९. शहा आलम दुसरा याच्या काळात संपूर्ण शाही महाल दिव्यांनी सजविला जात असे आणि लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुसलमान सहभागी होत असत.

१०. दिवाळी हा ख्रिसमसनंतरचा दुसरा असा सण आहे जो जगभरात विविध देशात भारतीय लोकांकडून साजरा केला जातो.

टॅग्स :Indian Traditionsभारतीय परंपराIndian Festivalsभारतीय सण