शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘पाणी’दार राज्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 04:27 IST

जल, जमीन आणि जंगलांचे संवर्धन झाल्यास शेतकºयांना कर्जमाफीची आवश्यकता भासणार नाही. यामधून राज्य सुजलाम, सुफलाम होईल. राज्य ‘पाणी’दार करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असून जनसहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.

पुणे : जल, जमीन आणि जंगलांचे संवर्धन झाल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता भासणार नाही. यामधून राज्य सुजलाम, सुफलाम होईल. राज्य ‘पाणी’दार करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असून जनसहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.‘पानी फाउंडेशन’च्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१७’ स्पर्धचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलामध्ये झाला. अभिनेता शाहरूख खान, जलसंधारणमंत्री राम शिंदे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, पानी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी, जमनादेवी बजाज ट्रस्टचे राजीव बजाज, टाटा ट्रस्टचे आर. वेंकट, पिरामल फाऊंडेशनचे अजय पिरामल, एचडीएफडीसीच्या झिया लालकाका, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती’वर भर दिला असून सरकारी योजना या जनतेच्या योजना झाल्याशिवाय यशस्वी होत नाहीत. जलसंवर्धनासारखे कोणतेही मोठे काम नाही. पानी फाऊंडेशनचे काम मोठे असून राज्य शासन या उपक्रमाच्या पाठिशी आहे. एका व्यक्तीने मनात आणल्यानंतर काय होऊ शकते, हे आमिर खानने दाखवून दिले आहे. जनतेनेही त्यांची ताकद या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवून दिली.‘पानी फाऊंडेशन’चे काम असेच सुरू राहिले तर दोन वर्षांत म्हणजे २०१९पर्यंत महाराष्ट्र जलयुक्त दिसेल. सरकारच्या वतीने स्पर्धकांना साडेसहा कोटींची बक्षीसे जाहीर केली आहेत, असेही फडणवीस म्हणालेशाहरुख खान म्हणाला, पानी फाऊंडेशनने हा विचार कृतीतून सत्यात उतरविला आहे. यामध्ये खरे यश शेतकºयांचे असून त्यांच्या मेहनतीचेच हे फळ आहे. नीता अंबानी म्हणाल्या, आमिरने सुरू केलेली मोहीम आता लोकचळवळ झाली आहे.पंचमहाभूते निसर्गाचे महत्त्वाचे घटक आहेत. पाणी आपले भेदभाव न करता संगोपन करीत असते.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना आमिर म्हणाला, एवढ्या गावांतून लोक आल्याचा आनंद आहे. हे सगळे काम तुमच्या मेहनतीचे फळ आहे. पानी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ म्हणाले, आपण सर्वांनी मिळून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे धाडसी स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी लोकांची वज्रमूठ करावी लागेल.वर्ध्यातील कक्कडदरा पहिल्या बक्षिसाचे मानकरीवर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील कक्कडदरा गाव प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरून त्यांनी जलकरंडक पटकावला. गावाला ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. तर ३० लाखांचा द्वितीय क्रमांक सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील भोसरे आणि बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्यातील जायभायेवाडी या गावांना विभागून देण्यात आला. माण (जि. सातारा) तालुक्यातील बिदाल आणि केज(जि. बीड) तालुक्यातील पळसखेडा या गावांना २० लाख रुपयांचे तिसºया क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले.