शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

"भडकाऊ विधानं करणारे लोक, टीव्ही अँकर खुलेआम फिरताहेत अन् वकील, विचारवंत तुरुंगात..!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 19:15 IST

आजकाल राजकीय विचार, जात, धर्म यावर शिक्षा ठरवली जातेय : अरुंधती रॉय  

पुणे : आजकाल जपून बोलावे लागते. प्रत्येक पूर्णविराम, स्वल्पविरामाचा वेगळा अर्थ काढला जातो. राजकीय विचार, जात, धर्म यावर शिक्षा ठरवली जात आहे. भडकाऊ विधान करणारे लोक, टीव्ही अँकर खुलेआम फिरत आहेत आणि वकील, विचारवंत यांना तुरुंगात डांबले जात आहे , अशा खरमरीत शब्दात प्रसिद्ध लेखिका आणि ब्लॉगर अरुंधती रॉय यांनी सद्य परिस्थितीवर बोट ठेवले. 

पुण्यात एल्गार परिषदेचे शनिवारी( दि. ३०) आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. रॉय म्हणाल्या, कोरेगाव भीमा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्वाना लवकरात लवकर मुक्त केले जावे हीच माझी भावना. मोठी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. ती वाचण्यातच संपूर्ण आयुष्य निघून जाईल. 

शेतकरी आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा... 

शेतकरी आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. कृषी विधेयके मागे घेतली जावी. दिल्लीच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. तसेच शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. मात्र आपण शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याची गरज आहे. तसेच पश्चिम बंगाल निवडणुकाजवळ येत आहेत. त्या अनुषंगाने बातम्या पेरल्या जात आहेत. बदनाम केले जाणे, दबाव निर्माण करणे अशा परिस्थितीत परिषद आयोजित करणे ही धाडसाची बाब आहे.

भारतात आपल्याला हजारो वर्षे मागे नेले जात आहे. एल्गार परिषद संविधानविरोधी काम करणारी नाही. शहरातील रस्त्यांवर दलितांवर खुलेआम अत्याचार, लोकांमध्ये नकारात्मकता पसरवणारे आपण नाही. कोरेगाव भीमाची लढाई २०० वर्षांपूर्वीची मात्र, वसाहतीकरणाचे अंश मागे सोडून गेले. पेशवाई गेली, ब्राम्हणवाद गेला नाही. ब्राम्हणवाद दिवसेंदिवस वाढतच आहे. एकविसाव्या शतकात संघ ब्राम्हणवादाचे नेतृत्व करत आहे. संसद त्यांच्या हातात आहे, ज्यांचे गोमूत्र हे आवडीचे औषध आहे. मोदींच्या रुपात दिल्लीच्या सत्तेवर बसले आहे. असेही रॉय यावेळी म्हणाल्या.

भांडवलशाहीमुळे देशात विषमता वाढीस.... भांडवलशाहीमुळे देशात विषमता वाढीस लागली आहे. कोरोना काळात कोट्यवधी लोकांनी रोजगार गमावला, याच वेळी भारतातील श्रीमंतांची संपत्ती वाढत होती. कॉर्पोरेट वर्गाकडे सर्व सुविधा एकवटल्या आहेत. या वर्गाची कोणती जात आहे? कॉर्पोरेट कंपन्यांवर घराणेशाहीचा हक्क आहे.

टॅग्स :PuneपुणेElgar morchaएल्गार मोर्चाPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकार