शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

"भडकाऊ विधानं करणारे लोक, टीव्ही अँकर खुलेआम फिरताहेत अन् वकील, विचारवंत तुरुंगात..!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 19:15 IST

आजकाल राजकीय विचार, जात, धर्म यावर शिक्षा ठरवली जातेय : अरुंधती रॉय  

पुणे : आजकाल जपून बोलावे लागते. प्रत्येक पूर्णविराम, स्वल्पविरामाचा वेगळा अर्थ काढला जातो. राजकीय विचार, जात, धर्म यावर शिक्षा ठरवली जात आहे. भडकाऊ विधान करणारे लोक, टीव्ही अँकर खुलेआम फिरत आहेत आणि वकील, विचारवंत यांना तुरुंगात डांबले जात आहे , अशा खरमरीत शब्दात प्रसिद्ध लेखिका आणि ब्लॉगर अरुंधती रॉय यांनी सद्य परिस्थितीवर बोट ठेवले. 

पुण्यात एल्गार परिषदेचे शनिवारी( दि. ३०) आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. रॉय म्हणाल्या, कोरेगाव भीमा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्वाना लवकरात लवकर मुक्त केले जावे हीच माझी भावना. मोठी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. ती वाचण्यातच संपूर्ण आयुष्य निघून जाईल. 

शेतकरी आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा... 

शेतकरी आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. कृषी विधेयके मागे घेतली जावी. दिल्लीच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. तसेच शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. मात्र आपण शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याची गरज आहे. तसेच पश्चिम बंगाल निवडणुकाजवळ येत आहेत. त्या अनुषंगाने बातम्या पेरल्या जात आहेत. बदनाम केले जाणे, दबाव निर्माण करणे अशा परिस्थितीत परिषद आयोजित करणे ही धाडसाची बाब आहे.

भारतात आपल्याला हजारो वर्षे मागे नेले जात आहे. एल्गार परिषद संविधानविरोधी काम करणारी नाही. शहरातील रस्त्यांवर दलितांवर खुलेआम अत्याचार, लोकांमध्ये नकारात्मकता पसरवणारे आपण नाही. कोरेगाव भीमाची लढाई २०० वर्षांपूर्वीची मात्र, वसाहतीकरणाचे अंश मागे सोडून गेले. पेशवाई गेली, ब्राम्हणवाद गेला नाही. ब्राम्हणवाद दिवसेंदिवस वाढतच आहे. एकविसाव्या शतकात संघ ब्राम्हणवादाचे नेतृत्व करत आहे. संसद त्यांच्या हातात आहे, ज्यांचे गोमूत्र हे आवडीचे औषध आहे. मोदींच्या रुपात दिल्लीच्या सत्तेवर बसले आहे. असेही रॉय यावेळी म्हणाल्या.

भांडवलशाहीमुळे देशात विषमता वाढीस.... भांडवलशाहीमुळे देशात विषमता वाढीस लागली आहे. कोरोना काळात कोट्यवधी लोकांनी रोजगार गमावला, याच वेळी भारतातील श्रीमंतांची संपत्ती वाढत होती. कॉर्पोरेट वर्गाकडे सर्व सुविधा एकवटल्या आहेत. या वर्गाची कोणती जात आहे? कॉर्पोरेट कंपन्यांवर घराणेशाहीचा हक्क आहे.

टॅग्स :PuneपुणेElgar morchaएल्गार मोर्चाPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकार