शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली की वाईट?; जाणून घ्या जनतेची 'मन की बात'

By कुणाल गवाणकर | Updated: January 15, 2021 22:09 IST

देशातील टॉप ५ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा समावेश

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याची सूत्रं हाती घेऊन जवळपास सव्वा वर्षांचा कालावधी होत आला आहे आहे. या कालावधीत सरकारला कोरोना संकटाचा सामना करावा लागला. याशिवाय अभिनेत्री कंगना राणौत, पत्रकार अर्णब गोस्वामी, सक्तवसुली संचलनालयाची कारवाई, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतरही सरकारची कामगिरी चांगली झाल्याचं एबीपी न्यूज आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाची साथ सोडत थेट काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. यानंतर कोरोना पाठोपाठ अवकाळी पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती अशा संकटांचा सामना राज्याला करावा लागला. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री ठाकरेंची कामगिरी चांगली झाल्याचं आकडेवारी सांगते.“घरी बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी”मुख्यमंत्री ठाकरेंच्या कामगिरीबद्दल जनतेनं समाधान व्यक्त केलं आहे. राज्यातील ४६ टक्के लोक मुख्यमंत्र्यांच्या कामावर खूप समाधानी आहेत. तर ३२ टक्के लोक समाधानी आहेत. २० टक्के जनता ठाकरेंच्या कारभारावर असमाधानी आहे. देशात सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या स्थानी आहेत. या यादीत ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या कारभारावर ७९ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्या (७८ टक्के), आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी तिसऱ्या (६७ टक्के) स्थानी आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर ५८ टक्के लोक संतुष्ट आहेत. विशेष म्हणजे पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेArvind Kejriwalअरविंद केजरीवालcorona virusकोरोना वायरस बातम्याEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयKangana Ranautकंगना राणौतarnab goswamiअर्णब गोस्वामी