शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

CoronaVirus: लोकांना अंधारातून काढावी लागते वाट; नारंगी परिसरात पालिकेची दिवाबत्ती गुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 23:12 IST

नारंगी परिसरात पालिकेची दिवाबत्ती गुल

पारोळ : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिक जीव मुठीत धरून घरात बसून आहेत. काही महत्त्वाच्या साहित्यासाठी लोकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन केलेले आहे. मात्र आता नारंगी परिसरातील काही भागात पथदिवे बंद असल्याने या कामांसाठी बाहेर जातानाही नागरिक तसेच रुग्णाचे नातेवाईक यांना अंधारातून वाट काढावी लागत आहे.

जीवनावश्यक वस्तू व या महामारीत लागणारी औषधे यासाठी नागरिकांना घराबाहेर पडावेच लागत आहे. रस्त्यावर रहदारी कमी असते. त्यातही अनेक जण औषधांच्या शोधात फिरत असतात. मात्र आधीच व्यापलेल्या नागरिकांना आता रस्त्यावर पथदिवे नसल्याने अंधाराचा सामना करावा लागतो आहे. नारंगी परिसरातील काही भागात पथदिवे बंद आहेत. त्यामुळे संध्याकाळनंतर परिसरात काळोख असतो.

वसई महापालिकेच्या दिवाबत्ती विभागाच्या गोंधळ कारभाराचा फटका येथील रहिवाशांना बसतो. नारंगी बायपास रोड पालिकेच्या गार्डन शेजारून सदनिकांकडे रस्ता जातो आणि अनेक महिन्यापासून पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे याचा नाहक त्रास होत आहे. पालिका पथदिव्यांसाठी लाखो रुपये खर्च करत असून साधे रस्त्यावर लाईट ही नसतील तर हा पैसा जातो कुठे असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. रस्त्याच्या बाजूला कचरा असून, दुसरीकडे अंधाराचा फायदा घेत मद्यपी, चोरट्यांचा येथील वावर वाढला आहे. परिणामी नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई