शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने काढले शेतकऱ्यांचे दिवाळे; राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 01:38 IST

हजारो कोटींचे नुकसान, बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू

कोल्हापूर : परतीचा पाऊस आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. यामुळे होणारे नुकसान हजारो कोटी रुपयांत जाण्याची शक्यता आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. ते पूर्ण झाल्यावरच नुकसानीचा नेमका आकडा कळेल. मात्र, शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला गेला आहे. त्यांना सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.

पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत एक लाखाहून अधिक हेक्टरवरील पिकांचे महापुरामुळे नुकसान झाले होते. त्यानंतर अतिवृष्टीमुळे २५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. भाजीपाला, भात, बाजरी, रब्बी ज्वारीचा यामध्ये समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली. सांगली जिल्ह्यात २४ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांसह अन्य पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचा हा आकडा एक हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यातही ७० हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांना परतीच्या पावसाचा फटका बसला. बागांमध्ये पाणी साठल्यामुळे मुळे कुजू लागली आहेत. घडातील मणी गळून पडत आहेत. आॅक्टोबरमध्ये छाटणी झालेल्या बागांवर दावणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कांदा पिकालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

विदर्भातील अमरावती विभागाला अवकाळीचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. पाच हजार ३८२ गावांतील १२ लाख १८ हजार २७८ हेक्टरमधील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. १० लाख ५२ हजार २२ शेतकºयांच्या कापूस, सोयाबीन, ज्वारी, धान या पिकांचे नुकसान झाले. विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले आहेत. खान्देशातही अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील (पान ६ वर) ज्वारी, कापूस, मका, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे लिंबू आणि संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने गुरुवारपासून बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू केले आहेत.

मराठवाड्यात सततच्या पावसामुळे कापणीला आलेले सोयाबीन, ज्वारी, भात या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे आठ ते दहा लाख हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसल्याचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात क्यार वादळ आणि पावसामुळे भात, सुपारी, नारळ, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील आपद््ग्रस्तांना स्वतंत्रपणे ५० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.राज्यात द्राक्ष उत्पादनात अव्वल असणाºया नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले आहे. अधिकृत नोंदणी झालेल्या पावणेदोन लाख एकर द्राक्ष बागा गळ, कूज, डाऊनी, भुरी या रोगांनी वाया गेल्या आहेत. यंदा द्राक्ष हंगाम अवघा तीस टक्के राहाणार आहे. ७० टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. - केशव भोसले, संचालक, द्राक्ष बागायतदार संघ, नाशिकपीक नुकसानाच्या अर्जाची मुदत वाढवावी!नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने कोणतीही अट न लावता भरपाई द्यावी, तसेच पीक नुकसानीच्या माहितीचे अर्ज सादर करण्याची मुदत शासनाने वाढवून द्यावी, अशी मागणी अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.

टॅग्स :Rainपाऊस