शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

अवकाळीने काढले शेतकऱ्यांचे दिवाळे; राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 01:38 IST

हजारो कोटींचे नुकसान, बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू

कोल्हापूर : परतीचा पाऊस आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. यामुळे होणारे नुकसान हजारो कोटी रुपयांत जाण्याची शक्यता आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. ते पूर्ण झाल्यावरच नुकसानीचा नेमका आकडा कळेल. मात्र, शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला गेला आहे. त्यांना सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.

पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत एक लाखाहून अधिक हेक्टरवरील पिकांचे महापुरामुळे नुकसान झाले होते. त्यानंतर अतिवृष्टीमुळे २५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. भाजीपाला, भात, बाजरी, रब्बी ज्वारीचा यामध्ये समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली. सांगली जिल्ह्यात २४ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांसह अन्य पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचा हा आकडा एक हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यातही ७० हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांना परतीच्या पावसाचा फटका बसला. बागांमध्ये पाणी साठल्यामुळे मुळे कुजू लागली आहेत. घडातील मणी गळून पडत आहेत. आॅक्टोबरमध्ये छाटणी झालेल्या बागांवर दावणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कांदा पिकालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

विदर्भातील अमरावती विभागाला अवकाळीचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. पाच हजार ३८२ गावांतील १२ लाख १८ हजार २७८ हेक्टरमधील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. १० लाख ५२ हजार २२ शेतकºयांच्या कापूस, सोयाबीन, ज्वारी, धान या पिकांचे नुकसान झाले. विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले आहेत. खान्देशातही अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील (पान ६ वर) ज्वारी, कापूस, मका, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे लिंबू आणि संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने गुरुवारपासून बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू केले आहेत.

मराठवाड्यात सततच्या पावसामुळे कापणीला आलेले सोयाबीन, ज्वारी, भात या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे आठ ते दहा लाख हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसल्याचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात क्यार वादळ आणि पावसामुळे भात, सुपारी, नारळ, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील आपद््ग्रस्तांना स्वतंत्रपणे ५० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.राज्यात द्राक्ष उत्पादनात अव्वल असणाºया नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले आहे. अधिकृत नोंदणी झालेल्या पावणेदोन लाख एकर द्राक्ष बागा गळ, कूज, डाऊनी, भुरी या रोगांनी वाया गेल्या आहेत. यंदा द्राक्ष हंगाम अवघा तीस टक्के राहाणार आहे. ७० टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. - केशव भोसले, संचालक, द्राक्ष बागायतदार संघ, नाशिकपीक नुकसानाच्या अर्जाची मुदत वाढवावी!नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने कोणतीही अट न लावता भरपाई द्यावी, तसेच पीक नुकसानीच्या माहितीचे अर्ज सादर करण्याची मुदत शासनाने वाढवून द्यावी, अशी मागणी अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.

टॅग्स :Rainपाऊस