शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

अवकाळीने काढले शेतकऱ्यांचे दिवाळे; राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 01:38 IST

हजारो कोटींचे नुकसान, बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू

कोल्हापूर : परतीचा पाऊस आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. यामुळे होणारे नुकसान हजारो कोटी रुपयांत जाण्याची शक्यता आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. ते पूर्ण झाल्यावरच नुकसानीचा नेमका आकडा कळेल. मात्र, शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला गेला आहे. त्यांना सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.

पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत एक लाखाहून अधिक हेक्टरवरील पिकांचे महापुरामुळे नुकसान झाले होते. त्यानंतर अतिवृष्टीमुळे २५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. भाजीपाला, भात, बाजरी, रब्बी ज्वारीचा यामध्ये समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली. सांगली जिल्ह्यात २४ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांसह अन्य पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचा हा आकडा एक हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यातही ७० हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांना परतीच्या पावसाचा फटका बसला. बागांमध्ये पाणी साठल्यामुळे मुळे कुजू लागली आहेत. घडातील मणी गळून पडत आहेत. आॅक्टोबरमध्ये छाटणी झालेल्या बागांवर दावणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कांदा पिकालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

विदर्भातील अमरावती विभागाला अवकाळीचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. पाच हजार ३८२ गावांतील १२ लाख १८ हजार २७८ हेक्टरमधील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. १० लाख ५२ हजार २२ शेतकºयांच्या कापूस, सोयाबीन, ज्वारी, धान या पिकांचे नुकसान झाले. विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले आहेत. खान्देशातही अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील (पान ६ वर) ज्वारी, कापूस, मका, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे लिंबू आणि संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने गुरुवारपासून बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू केले आहेत.

मराठवाड्यात सततच्या पावसामुळे कापणीला आलेले सोयाबीन, ज्वारी, भात या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे आठ ते दहा लाख हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसल्याचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात क्यार वादळ आणि पावसामुळे भात, सुपारी, नारळ, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील आपद््ग्रस्तांना स्वतंत्रपणे ५० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.राज्यात द्राक्ष उत्पादनात अव्वल असणाºया नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले आहे. अधिकृत नोंदणी झालेल्या पावणेदोन लाख एकर द्राक्ष बागा गळ, कूज, डाऊनी, भुरी या रोगांनी वाया गेल्या आहेत. यंदा द्राक्ष हंगाम अवघा तीस टक्के राहाणार आहे. ७० टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. - केशव भोसले, संचालक, द्राक्ष बागायतदार संघ, नाशिकपीक नुकसानाच्या अर्जाची मुदत वाढवावी!नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने कोणतीही अट न लावता भरपाई द्यावी, तसेच पीक नुकसानीच्या माहितीचे अर्ज सादर करण्याची मुदत शासनाने वाढवून द्यावी, अशी मागणी अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.

टॅग्स :Rainपाऊस