शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

पवारांची अवस्था : 'तुम मुझे दोस्तो से बचाव, मै दुश्मनो से निपट लुंगा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 12:48 IST

१९६० नंतरच्या राजकारणात शरद पवार यांनी पुरोगामीत्वाची कास धरून जातीवादाला विरोध करणार भूमिका घेतली. त्याचबरोबर आपले मानस पिता यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणात ज्या त्रुटी राहिल्या, त्या त्रुटी दूर करून ठोशास ठोसा, मुत्सद्दीपणा, पाडापाडी अशा प्रकारचे तत्व त्यांनी कृतीत आणले. परंतु, यात पुरोगामीत्वापासून पवारांनी कधीही फारकत घेतली नाही.

-राजा मानेखरंच खुद्द शरद पवारच आपले खंदे शिलेदार भाजप-शिवसेनेच्या तंबूत घडताहेत ?...नात्या-गोत्यांच्या पलिकडचे खरे शरद पवार आपल्याला माहितच नाहीत...कुणी फासावर लटकवायला निघाले तरी मी साहेबांची साथ सोडणार नाही, असा बाणा पवारांच्या आशीर्वादाने "सम्राट" बनलेले का दाखवत नाहीत?..तुम मुझे दोस्तोसे बचाव, दुश्मनोसे मै खुद निपट लुंगा...अशी पवारांची अवस्था झालीय ?..असे असंख्य प्रश्न राष्ट्रवादीतून सुरू 'आउटगोइंग'मुळे उपस्थित होत आहे.

महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. सध्याच्या घडामोडी या प्रामुख्याने शरद पवार या व्यक्तीमत्वाभवतीच फिरत आहेत. खर तर शरद पवार म्हणजे राजकारणातील रजनीकांत. देशात असो वा महाराष्ट्रात काहीही घडलं की, त्यात पवारांचा हात असावा, अशा प्रकारचं सूत्र आपण अनेक वर्षांपासून मांडत आलो आहोत. सध्याच्या घडामोडींवरूनच अशाच प्रकारची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. खुद्द पवार साहेबच राष्ट्रवादीतील नेत्यांना भाजप आणि शिवसेनेत पाठवत असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.

शरद पवार यांच्याविषयीच्या या चर्चांनी सोशल मीडियावर मनोरंजन होत असलं तर खुद्द पवार यातून व्यथीत झाल्याचे दिसून येते. पत्रकारांवर चिडणे असो वा त्यांच्याबद्दल येत असलेल्या बातम्या असोत यामुळे पवार खरच चिडचिडे झाले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवार म्हणदे देशाच्या राजकारणातील मोठं नाव आहे. मुळातच पवार यांची जडणघडण सत्यशोधक आणि पुरोगामी कुटुंबात झाली आहे. त्यामुळे पत्रकाराने नातेवाईकांवरून विचारलेल्या प्रश्नामुळे चिडावं, असं त्यांचं व्यक्तीमत्व असल्याचं मान्य करणे कठीणच आहे.याची उकल आपल्याला इतिहासात मिळेल. १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोमात होती. या चळवळीत पवार कुटुंबीय देखील सक्रिय होतं. त्यावेळी बारामती मतदार संघातून केशवराव जेधे यांच्यासारखा नेता विजयी झाला होता. दुर्दैवाने जेधेंचं निधन झालं. त्यानंतर जेधेंचे चिरंजीव १९६० मध्ये बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तोपर्यंत शरद पवार काँग्रेसच्या विचारधारेत सहभागी झाले होते. त्याचवेळी १९६० च्या निवडणुकीत शरद पवार यांचे बंधु वसंतराव पवार संयुक्त महाराष्ट्र समितीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे जेधे होते. त्यावेळी काँग्रेसच्या विचारांनी भारावलेल्या पवारांनी भावाचा प्रचार न करता काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. या गोष्टीची दखल घेणे आवश्यक आहे. या घटनेवरून स्पष्ट होते की, शरद पवार सुरुवातीच्या काळापासूनच नातीगोती आणि पक्षीय राजकारणाकडे त्रयस्तपणे पाहात आले आहेत.सध्यातरी राष्ट्रवादी पक्षातून जाणाऱ्यांना थांबवायला पवार तयार नाहीत. जे जात आहेत, त्यांना परवानगी देण्याऐवजी ते 'नो कॉमेंट' म्हणून वेळ मारून नेत आहेत. मात्र शरद पवार खरच आपले कार्यकर्ते, नेते आणि नातलग यांना भाजपमध्ये पाठवत असतील तर येत्या काळात राष्ट्रवादी पक्ष खऱ्या अर्थानं भाजपमध्ये विलीन झाला असा तार्किक मुद्दा समोर येऊ शकतो.१९६० नंतरच्या राजकारणात शरद पवार यांनी पुरोगामीत्वाची कास धरून जातीवादाला विरोध करणार भूमिका घेतली. त्याचबरोबर आपले मानस पिता यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणात ज्या त्रुटी राहिल्या, त्या त्रुटी दूर करून ठोशास ठोसा, मुत्सद्दीपणा, पाडापाडी अशा प्रकारचे तत्व त्यांनी कृतीत आणले. परंतु, यात पुरोगामीत्वापासून पवारांनी कधीही फारकत घेतली नाही. किंबहुना मराठवाडा नामविस्ताराचा मुद्दा किंवा महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण देण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतले.राजकारण करताना शरद पवार कधीही भावनिक झाल्याचे ऐकीवात नाही. गरज असेल तिथे आपले मोहरे पुढे करून पाडापाडीचं राजकारण करण्यासाठी त्यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या १९६० नंतरच्या राजकीय उलथापालथीत शरद पवार यशवंतराव चव्हाणांसोबत देखील राहिले नव्हते. त्यावेळी यशवंतरावजी काँग्रेसच्या वाटेवर होते. परंतु, पवार यांनी तेंव्हा स्वतंत्र भूमिका घेतली होती. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्राची अस्मिता आणि दिल्लीचे राजकारण अशा स्थितीत पवारांनी आपलं उपद्रवमुल्य कायम राखून बस्तान बसवले होते.पवारांनी निवडणुकीच्या राजकारणात कधीही पराभव पाहिला नाही. परंतु, काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना नामुष्कीचा पराभव स्वीकारावा लागला होता. ही गोष्टी साधारण १९९७-९८ मधील होती. काँग्रेसमधील आपलं उपद्रव मुल्य घटत असल्याचे लक्षात आल्यानंतर पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यांनी तारिक अन्वर, पी.ए. संगमा यांना सोबत घेत सोनिया गांधी परदेशी असल्याचा मुद्दा जनतेसमोर ठेवला. तरी देखील पवार कायमच राष्ट्रीय राजकारणात पावरफुल ठरले. त्यांच्यामागे खासदार किती हा मुद्दा कधी चर्चिला गेला नाही. उलट पवार आपल्यासोबत आहेत का, हे महत्त्वाचे वाटत होते.राज्याच्या राजकारणात शरद पवारांनी सोयीस्कररित्या सोशल इंजियनिरींग केलं. अनेकांना पदं दिली, शिक्षण संस्था, साखर कारखाने दिली. प्रत्येक जातीला सोबत घेत अनेकांना संधी दिली. यामध्ये रामदास आठवले असतील, मधुकर पिचड असतील, छगन भुजबळ किंवा अरुण गुजराथी असतील. आज यापैकी अनेक नेते त्यांना सोडून जात आहेत. परंतु, वेळप्रसंगी स्वत:च्या भावाचा प्रचार न करणारे पवार पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना तुम्ही थांबा कसं म्हणतील हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे.२०१४ नंतर देशाच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. संघ परिवाराने मागील ३० वर्षांपासून केलेल्या कामाचे फळ भाजपला २०१४ मध्ये मिळाले. हे फळ पदरात पाडून घेण्याचं श्रेय प्रामुख्याने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कार्यपद्धतीला आणि कार्यशैलीला जातं. परंतु, मजबूत विरोधक असणे हा तार्किक मुद्दाही यानिमित्ताने समोर येतो.तुम मुझे दोस्तो से बचाव,मै दुश्मनो से निपट लुंगाराष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतरावर वरील शेर चपखल बसतो. शरद पवारांची अवस्था अशीच काहीशी झाली आहे. यातून दोन पर्याय पवारांसमोर येतात. पहिला म्हणजे पक्षाची नव्याने बांधणी करणे. मात्र वाढत्या वयामुळे पवारांना पक्षबांधणी नव्याने करणे तितकेसे सोप नाही. तर दुसरा पर्याय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये किंवा भाजपमध्ये विलीन करणे. यापैकी दुसरा पर्याय हास्यास्पद वाटू शकतो. परंतु, राजकीय तर्कशास्त्र जो निष्कर्ष काढतं ते आजतरी हेच आहे. त्याचं कारण म्हणजे, लाभार्थ्यांची पिलावळ पवारांपासून दूर जाऊ इच्छित आहे. त्याचवेळी महाराष्ट्राची अस्मिता दिल्ली दरबारी जतन करणारा नेता अडचणीत आल्याची खंतही मराठी माणसाला वाटेत असेल यात दुमत असू शकत नाही.