शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पवारसाहेब.. चार दोन खासदारांवर पंतप्रधानपद कसे शक्य आहे हो. ? महादेव जानकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 16:00 IST

पुढे मागे आमच्या पक्षाला पंतप्रधानपदाची संधी मिळेल,तेव्हा पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न रासप पूर्ण करेल...

ठळक मुद्दे देशात सक्षम, समृध्द व संरक्षित सरकार हवे असेल तर नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी रासपची भुमिका

शिरूर: शरद पवार हे आदरणीय नेते आहेत. त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. मात्र चार दोन खासदारांवर पंतप्रधानपद कसे शक्य आहे हो ? पुढे मागे आमच्या पक्षाला पंतप्रधानपदाची संधी मिळेल,तेव्हा पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न रासप पूर्ण करेल. असा टोला पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत लगावला..         रांजणगाव गणपती येथे सभेला जाण्यापूर्वी जानकर यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. जानकर यांनी पवारांवर सडकून टीका केली. ते म्हणाले. पवार शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतात. मग त्यांनी समाजात दरी का निर्माण केली ? त्यांनी सहकार चळवळ मोडीत काढली. खासगी साखर कारखानदारी आणली. ज्यांच्या नावाचा जप पवार करतात त्या शाहू महाराजांनी १८०२ मध्ये सर्वप्रथम आरक्षण दिले. मात्र शाहू महाराजांच्या जातीला आरक्षण मिळण्यासाठी १५० वर्ष लागली. मराठा समाजाचे ११मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.विरोधकांनी मराठा ओबीसी, मराठा धनगर यांच्यात भांडणे लावली. मुख्यमंत्र्यांनी मात्र शांत डोक्याने कायद्याच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण दिले.          जानकर म्हणाले , देशात सक्षम, समृध्द व संरक्षित सरकार हवे असेल तर नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी रासपची भुमिका आहे.आजपर्यंत भारताला जगात फारशी किंमत नव्हती. पंतप्रधान मोदी यांच्या कर्तृत्व व चांगल्या धोरणामुळे आज जगात भारत चौथ्या स्थानावर आहे, असा धोरणात्मक विचारांचा पंतप्रधान हवा की घराणेशाहीतला पंतप्रधान हवा ते जनतेनेच ठरवावे. गरीबी हटावचा नारा देणा ऱ्या काँग्रेसने सत्ता भोगली मात्र गरीबी कोणाची हटली याचे भारतातील जनतेने चिंतन करावे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील उच्चशिक्षित आहेत, चांगले संसदपटू आहेत प्रशासनाची जाण असणारे नेतृत्व आहे. अशा उमेदवारास दिलेले एक  मत मोदींना पंतप्रधान बनवतील.यासाठी सरकारने आदिवासीना जेवढे बजेट आहे तेवढे  धनगरांना दिले. सर्वोच्च न्यायालयात एसटी संदर्भातील प्रलंबित आहे.तेथेही सरकार सकारात्मक  भूमिका घेत आहे. यामुळे आम्हीच धनगरांना आरक्षण देणार असल्याचा दावा जानकर यांनी केला.

............

बैलगाडा शर्यतीचा विषय न्यायप्रविष्ट आहे. मात्र या विषयावर आम्ही सर्व सभागृह एकत्र आणले. आम्ही कायदा केला. न्यायालयात गेल्याने विषय प्रलंबित राहिला. मात्र कायद्याच्या अधीन राहून आम्हीच या शर्यती सुरू करू असा दावाही जानकर यांनी केला.

टॅग्स :ShirurशिरुरMahadev Jankarमहादेव जानकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवार