शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

रुग्णांना निकृष्ट औषधे!, दुकानांची तपासणी न करताच दिले परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 5:51 AM

राज्यात निकृष्ट दर्जाची औषधे विकली गेली असून, या औषधांचे सेवन केलेल्या नागरिकांना भविष्यात गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते

मुंबई : राज्यात निकृष्ट दर्जाची औषधे विकली गेली असून, या औषधांचे सेवन केलेल्या नागरिकांना भविष्यात गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) अहवालात व्यक्त करण्यात आली असून, अन्न व औषधी प्रशासनावर कडक ताशेरे ओढले आहेत.‘कॅग’चा हा अहवाल बुधवारी विधिमंडळात सादर करण्यात आला. बाजारात औषधांचा साठा येण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासली जाते. मात्र, सरकारच्या अखत्यारित असलेल्या अन्न व औषध प्रशासनाकडून ही गुणवत्ता तपासली गेली नाही. या विभागाने १,५३५ औषध विक्रेत्यांच्या परवान्यांची तपासणीच केली नाही, तर १,२८६ औषध विक्रेत्यांना तपासणीविनाच परवान्यांचे वाटप करण्यात आले.राज्यातील औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून सिरप,गोळ्या, इंजेक्शनसारख्या महत्त्वाच्या ९२ औषधांच्या तपासणीत ती कमी मानांकनाची असल्याचे आढळून येऊनही, त्या औषधांचा पुरवठा बाजारात होऊन त्याची विक्री झाली. अन्न व औषध प्रशासन विभागात असलेले अपुरे मनुष्यबळ, अपुºया प्रयोगशाळा आणि यंत्र सामग्री व कामकाज पद्धतीवर कॅगने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.कमी मानांकनाची औषधांची विक्री केल्याबद्दल या विभागाने संबंधित कंपन्यांवर कोणतीच कारवाई केली नाही वा उत्पादने बाजारातून मागे घेतली नाहीत.गुटखा, पानमसाला सारख्या उत्पादनांवर राज्यात बंदी असताना, त्याची विक्री करताना तो माल जप्त केला खरा. मात्र, त्याची तपासणी केली नाही. अनेक सौदर्य प्रसाधनांच्या मानांकनाची तपासणीही करण्यात आलेली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. परवान्यांचा घोळ असलेल्या औषध विक्रेत्यांकडून चुकीच्या औषधांचा पुरवठा होऊन, जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता कॅगने वर्तविली.

टॅग्स :medicinesऔषधं