शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

पतंगराव : भारती विद्यापीठ नावाच्या वटवृक्षाचे संस्थापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 02:25 IST

कडेगाव तालुक्यातील सोनसळ येथे ८ जानेवारी १९४५ रोजी पतंगराव कदम यांचा जन्म झाला. गावात पहिली ते चौथीपर्यंत एकशिक्षकी शाळा होती. याच शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिरसगाव हायस्कूलमध्ये घेतले.

कडेगाव तालुक्यातील सोनसळ येथे ८ जानेवारी १९४५ रोजी पतंगराव कदम यांचा जन्म झाला. गावात पहिली ते चौथीपर्यंत एकशिक्षकी शाळा होती. याच शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिरसगाव हायस्कूलमध्ये घेतले.आठवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी कुंडल येथे क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांनी स्थापन केलेल्या नाना पाटील बोर्डिंगमध्ये घेतले. तेथे तांबटकाका नावाचे ध्येयवादी अधीक्षक होते. ते धान्य गोळा करून आणायचे आणि बोर्डिंग चालवायचे. पतंगराव कदम यांचे आई-वडीलही या बोर्डिंगसाठी एक पोते ज्वारी देत.नेत्यांचा प्रभावसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ डॉ. कदम यांनी लहान वयात अनुभवली.त्यांच्यावर शालेय जीवनातच यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते व वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाचा प्रभाव पडला. त्याकाळी शेकापचा मोठा प्रभाव होता. १९६० मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केल्यावर महाराष्ट्रात काँग्रेस अधिक मजबूत झाली.तहहयात कुलपतीभारती विद्यापीठाची स्थापना केल्यानंतर त्यांनी एम. ए. एल.एल. बी. पीएच.डी.पर्यंत शिक्षण घेतले. पुढे चारवेळा पुणे विद्यापीठात सिनेटवर निवडून आले. १९८५ मध्ये ते आमदार झाले. यानंतर ते मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून आले आणि भारती विद्यापीठाचे तहहयात कुलपती झाले.शंकरराव मोरे विद्यालयाची स्थापनाडॉ. पतंगराव कदम यांनी १९६८ मध्ये पुणे येथेच शंकरराव मोरे विद्यालय सुरू केले. त्यावेळी पुण्यात पौड फाट्याच्या पुढे एकही घर नव्हते. या फाट्याच्या अलीकडे एक माजी सैनिक कॉलनी होती. या कॉलनीजवळच्या जागेत हे विद्यालय सुरू झाले. या शाळेत पहिल्यांदा ३६ विद्यार्थी होते.पुणे विद्यापीठाच्या मॅनेजिंग कौन्सिलवरमहाराष्टÑ सरकारने विद्यापीठांचा कायदा बदलला आणि पदवीधरांमधून, संस्थांमधून, प्रचार्यांमधून विद्यापीठावर लोक निवडून जाऊ लागले. पुणे विद्यापीठात त्यावेळी पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार अशा जिल्ह्याचा समावेश होता. डॉ. पतंगराव कदम पदवीधर गटामधून उभे राहिले आणि सिनेटवर (मॅनेजमेंट कौन्सिल) निवडून आले. त्यानंतर ते चारवेळा पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलवर निवडून आले.तीन महाविद्यालयांची स्थापनापुणे विद्यापीठाच्या मॅनेजिंग कौन्सिलचा कारभार माहिती करून घेतला आणि १९७३ मध्ये एरंडवणे (पुणे) येथे तीन महाविद्यालये सुरू केली. पहिले कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, दुसरे लॉ कॉलेज व तिसरे मॅनेजमेन्ट इन्स्टिट्यूट काढले.शाखा विस्तारगतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन हे ध्येय मनात ठेवून पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाचे स्वर्गीय यशवंतराव मोहिते तहहयात अध्यक्ष होते. ५४ वर्षांमध्ये भारती विद्यापीठ ही अग्रगण्य संस्था म्हणून गणली जात आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक ते पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण देणाºया १७९ शैक्षणिक शाखा आहेत. धनकवडी, पुणे, एरंडवणे, पुणे, दिल्ली, नवी मुंबई, सांगली, कोल्हापूर, कडेगाव अशा ७ शहरात १० शैक्षणिक संकुले आहेत. ४१ देशातील ८०० हून अधिक परदेशी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे, तर २० लाखांहून अधिक माजी विद्यार्थी आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंतचिकित्सा, व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, हॉटेल व्यवस्थापन, विधी, सामाजिक शास्त्रे, समाजकार्य, वास्तुरचना शास्त्र, पर्यावरण शास्त्र, शारीरिक शिक्षण, दृश्य कला, कृषी, जैविक तंत्रज्ञान, नेत्रविद्या, श्रवण शास्त्र, छाया चित्रकला आदी अभ्यासक्रम भारती विद्यापीठात शिकवले जातात.दुबई, अमेरिकेतही केंदे्रडॉ. पतंगराव कदम यांनी दुबईत काही शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अमेरिकेतही भारती विद्यापीठाने मराठी शिक्षणाची ४० केंद्रे सुरू केली आहेत. तेथील मराठी बांधवांचा तसा आग्रह होता.

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमMaharashtraमहाराष्ट्र