शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पतंगराव : भारती विद्यापीठ नावाच्या वटवृक्षाचे संस्थापक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 02:25 IST

कडेगाव तालुक्यातील सोनसळ येथे ८ जानेवारी १९४५ रोजी पतंगराव कदम यांचा जन्म झाला. गावात पहिली ते चौथीपर्यंत एकशिक्षकी शाळा होती. याच शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिरसगाव हायस्कूलमध्ये घेतले.

कडेगाव तालुक्यातील सोनसळ येथे ८ जानेवारी १९४५ रोजी पतंगराव कदम यांचा जन्म झाला. गावात पहिली ते चौथीपर्यंत एकशिक्षकी शाळा होती. याच शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिरसगाव हायस्कूलमध्ये घेतले.आठवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी कुंडल येथे क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांनी स्थापन केलेल्या नाना पाटील बोर्डिंगमध्ये घेतले. तेथे तांबटकाका नावाचे ध्येयवादी अधीक्षक होते. ते धान्य गोळा करून आणायचे आणि बोर्डिंग चालवायचे. पतंगराव कदम यांचे आई-वडीलही या बोर्डिंगसाठी एक पोते ज्वारी देत.नेत्यांचा प्रभावसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ डॉ. कदम यांनी लहान वयात अनुभवली.त्यांच्यावर शालेय जीवनातच यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते व वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाचा प्रभाव पडला. त्याकाळी शेकापचा मोठा प्रभाव होता. १९६० मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केल्यावर महाराष्ट्रात काँग्रेस अधिक मजबूत झाली.तहहयात कुलपतीभारती विद्यापीठाची स्थापना केल्यानंतर त्यांनी एम. ए. एल.एल. बी. पीएच.डी.पर्यंत शिक्षण घेतले. पुढे चारवेळा पुणे विद्यापीठात सिनेटवर निवडून आले. १९८५ मध्ये ते आमदार झाले. यानंतर ते मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून आले आणि भारती विद्यापीठाचे तहहयात कुलपती झाले.शंकरराव मोरे विद्यालयाची स्थापनाडॉ. पतंगराव कदम यांनी १९६८ मध्ये पुणे येथेच शंकरराव मोरे विद्यालय सुरू केले. त्यावेळी पुण्यात पौड फाट्याच्या पुढे एकही घर नव्हते. या फाट्याच्या अलीकडे एक माजी सैनिक कॉलनी होती. या कॉलनीजवळच्या जागेत हे विद्यालय सुरू झाले. या शाळेत पहिल्यांदा ३६ विद्यार्थी होते.पुणे विद्यापीठाच्या मॅनेजिंग कौन्सिलवरमहाराष्टÑ सरकारने विद्यापीठांचा कायदा बदलला आणि पदवीधरांमधून, संस्थांमधून, प्रचार्यांमधून विद्यापीठावर लोक निवडून जाऊ लागले. पुणे विद्यापीठात त्यावेळी पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार अशा जिल्ह्याचा समावेश होता. डॉ. पतंगराव कदम पदवीधर गटामधून उभे राहिले आणि सिनेटवर (मॅनेजमेंट कौन्सिल) निवडून आले. त्यानंतर ते चारवेळा पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलवर निवडून आले.तीन महाविद्यालयांची स्थापनापुणे विद्यापीठाच्या मॅनेजिंग कौन्सिलचा कारभार माहिती करून घेतला आणि १९७३ मध्ये एरंडवणे (पुणे) येथे तीन महाविद्यालये सुरू केली. पहिले कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, दुसरे लॉ कॉलेज व तिसरे मॅनेजमेन्ट इन्स्टिट्यूट काढले.शाखा विस्तारगतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन हे ध्येय मनात ठेवून पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाचे स्वर्गीय यशवंतराव मोहिते तहहयात अध्यक्ष होते. ५४ वर्षांमध्ये भारती विद्यापीठ ही अग्रगण्य संस्था म्हणून गणली जात आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक ते पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण देणाºया १७९ शैक्षणिक शाखा आहेत. धनकवडी, पुणे, एरंडवणे, पुणे, दिल्ली, नवी मुंबई, सांगली, कोल्हापूर, कडेगाव अशा ७ शहरात १० शैक्षणिक संकुले आहेत. ४१ देशातील ८०० हून अधिक परदेशी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे, तर २० लाखांहून अधिक माजी विद्यार्थी आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंतचिकित्सा, व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, हॉटेल व्यवस्थापन, विधी, सामाजिक शास्त्रे, समाजकार्य, वास्तुरचना शास्त्र, पर्यावरण शास्त्र, शारीरिक शिक्षण, दृश्य कला, कृषी, जैविक तंत्रज्ञान, नेत्रविद्या, श्रवण शास्त्र, छाया चित्रकला आदी अभ्यासक्रम भारती विद्यापीठात शिकवले जातात.दुबई, अमेरिकेतही केंदे्रडॉ. पतंगराव कदम यांनी दुबईत काही शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अमेरिकेतही भारती विद्यापीठाने मराठी शिक्षणाची ४० केंद्रे सुरू केली आहेत. तेथील मराठी बांधवांचा तसा आग्रह होता.

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमMaharashtraमहाराष्ट्र