शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची ‘प्रवासी वाढवा’ योजना १७ वर्षांनंतर बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 05:52 IST

‘परिवर्तनाकडून खासगीकरणाकडे’ प्रवास करणाऱ्या एसटी महामंडळाने आणखी एक पाऊल पुढे टाकले. महामंडळाची अत्यंत यशस्वी ठरलेली ‘प्रवासी वाढवा’ ही योजना यंदा बंद करण्यात आली आहे.

- महेश चेमटेमुंबई - ‘परिवर्तनाकडून खासगीकरणाकडे’ प्रवास करणाऱ्या एसटी महामंडळाने आणखी एक पाऊल पुढे टाकले. महामंडळाची अत्यंत यशस्वी ठरलेली ‘प्रवासी वाढवा’ ही योजना यंदा बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी लाख रुपये बक्षीस असलेल्या या योजनेच्या अहवालाची प्रतीक्षा अद्याप मुख्यालयाला आहे. यामुळे अधिकाºयांच्या अनागोंदी कारभारामुळे या योजनेला तिलांजली देण्यात आली.परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी प्रवासी वाढवा योजनेचा प्रभाव पाहता, २१ डिसेंबर २०१६ रोजी योजनेच्या बक्षिसात वाढ केली होती. यामुळे प्रवासी योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाºया आगाराला २५ हजारांहून थेट १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्याची घोषणा केली होती. याच बरोबर वाहक आणि चालकाला अनुक्रमे ५ हजार आणि ३ हजार रुपये रोख देण्याचा निर्णयदेखील मंत्री रावते यांनी घेतला होता. मात्र, अधिकाºयांचा मनमानी कारभार आणि अल्प पाठिंबा, यामुळे प्रवासी योजना बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.एसटीचा ‘प्रवासी राजदूत’ वाहक-चालक मानला जातो. एसटीच्या वाहक-चालकांना प्रवासी वाढविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून रोख पारितोषिक देण्यात येत होते. राज्यातील २५० आगार पातळीवर सर्वाधिक प्रवासी वाहून नेणाºया वाहक आणि चालकास दरमहा रोख रक्कम देऊन गौरविण्यासाठी हे अभियान होते. या अभियानामुळे एसटीपासून दुरावलेला प्रवासी पुन्हा एसटीकडे वळण्यास सुरुवात होईल, असा विश्वास हे अभियान सुरू करताना, महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी व्यक्त केला होता.कशी होती योजना?- २००० साली एसटी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी ही योजना सुुरू केली होती. जानेवारी ते मार्च दरम्यान प्रवासी ‘सिझन’ नसल्यामुळे या काळात प्रवासी वाढविण्यासाठी या याजनेचा वापर केला जात होता.- त्या काळी प्रवासी योजनेंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाºया आगाराला २५ हजार रोख पारितोषिक देत गौरविण्यात येत होते. तीन महिन्यांच्या या योजनेत दरमहा आगाराला अशा प्रकारे गौरविण्यात येत असे. वाहतूक विभागाकडून ही योजना राबविण्यात येत होती.रकमेत वाढ, मात्र अहवालाचीच प्रतीक्षाडिसेंबर २०१६ मध्ये ‘१ जानेवारी १७ ते ३१ मार्च १७’ या कालावधीसाठी मंत्री रावते यांनी या योजनेच्या बक्षिसात चौपट वाढ केली. यामुळे पहिल्या क्रमांकाच्या आगाराला १ लाख रोख देण्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर, द्वितीय क्रमांकाच्या आगाराला ७५ हजार आणि तृतीय क्रमांकाला ५० हजार रोख देण्याचा निर्णय घेतला, तर उत्कृष्ट सांघिक कामगिरी करणाºया विभागाला ५० हजार रुपयांचे विशेष पारितोषिकही जाहीर करण्यात आले.मग रावतेंच्या निर्णयाचे काय?- एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक आर.आर.पाटील यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, जानेवारी ते मार्च या काळात कार्यरत असणारी एसटी महामंडळाची ‘प्रवासी वाढवा’ योजना बंद करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून ही योजना बंद आहे.- यामुळे या वर्षी ही योजना राबविण्यात आलेली नाही, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक आर.आर.पाटील यांनी सांगितले. यामुळे मंत्री रावते यांच्या ‘प्रवासी योजना-१७’ मध्ये बक्षिसाची रक्कम वाढविण्याचा निर्णय मग कसा घोषित केला? याची चर्चा सध्या महामंडळात रंगत आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळMaharashtraमहाराष्ट्र