शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

औरंगाबादमध्ये ११ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 21:44 IST

Aurangabad Lockdown : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता निर्णय. शनिवार आणि रविवारी १०० टक्के लॉकडाऊन

ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता घेण्यात आला निर्णय शनिवार, रविवारी १०० टक्के लॉकडाऊन

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या ११ मार्चपासून औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा रविवारी करण्यात आली. ११ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. औरंगाबादमधील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, राजकीय सभा, धार्मिक सभा, क्रीडा स्पर्धा याकाळात बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच या कालावधीमध्ये आठवडी बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, शनिवार रविवार पूर्ण लॉकडाऊन असलं तरी या कालावधीत वैद्यकीय सेवा, माध्यमांची कार्यालये, दुध विक्री, भाजीपाला आणि फळविक्री सुरू ठेवण्यात येणार आहे. "गर्दी टाळता येईल आणि अनावश्यक गर्दी होऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या वेगानं वाढतोय त्याला आळा घालता येईल अशा प्रकारचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला आहे. संपूर्ण शहरात मास्कचा वापर केला गेला पाहिजे, सुरक्षित अंतरही ठेवलं पाहिजे या सर्व बाबींकडे लक्ष देण्यात आलं आहे. सर्वांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे," असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. "नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला तरच जे काही शासन, स्थानिक प्रशासन उपाययोजना करत आहे त्याचा परिणाम दिसून येईल. आज मंत्रिमंडळातही कोरोनावर सादरीकरण झालं. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगितलं. तसंच अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे, सर्वांनी मास्क वापरलं पाहिजे, सुरक्षित अंतर ठेवलं पाहिज अशा सूचनाही त्यांनी केल्या. शासन आणि स्थानिक प्रशासनानंदेखील याची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. परंतु नागरिकांचं सहकार्य हे महत्त्वाचं आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू नये अशी चिंतादेखील बैठकीत व्यक्त करण्यात आली," असंही त्यांनी नमूद केलं.शनिवार, रविवार पूर्ण लॉकडाऊन

औरंगाबादमध्ये ११ मार्चपासून ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. तसंच या कालावधीत विवाह सोहळे रद्द करण्याचे आदेश टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले. दर शनिवारी आणि रविवारी आवश्यक सेवा वगळता १०० टक्के लॉकडाऊन असणार आहे. याव्यतिरिक्त जाधवमंडी बुधवार पासून बंद राहणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदे