शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर परप्रांतीयांची शेती

By admin | Updated: August 26, 2016 02:02 IST

सिडकोने एक रुपयाही मोबदला न देता ऐरोलीमधील कोटकर कुटुंबीयांची १ एकर २४ गुंठे जमीन ताब्यात घेतली

नामदेव मोरे,

नवी मुंबई- सिडकोने एक रुपयाही मोबदला न देता ऐरोलीमधील कोटकर कुटुंबीयांची १ एकर २४ गुंठे जमीन ताब्यात घेतली आहे. ट्रान्स हार्बर मार्गासाठी ही जमीन रेल्वेला दिली असून रेल्वेने भाजीपाला पिकविण्यासाठी ती परप्रांतीयाला दिली आहे. जमिनीचे मालक असलेले प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले असून त्याच जमिनीवर परप्रांतीय शेती करत असल्याचे पाहून अन्यायग्रस्त कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. देशातील पहिली स्मार्ट सिटी बनविण्याचा दावा करणाऱ्या सिडकोने ४५ वर्षांमध्ये प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीचा पूर्ण मोबदलाही दिलेला नाही. जमीन गेली व त्याचा मोबदलाही न मिळाल्याने अनेकांना जीवन जगताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाघिवली गावातील ६६ शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागितल्यानंतर शेतकऱ्यांच्या पिळवणुकीच्या अनेक घटना समोर येवू लागल्या आहेत. अन्याय झालेल्या कुटुंबीयांमध्ये ऐरोलीमधील शालिग्राम गणपत कोटकर यांचाही समावेश आहे. शासनाने त्यांची ३ एकर १८ गुंठे जमीन संपादित केली असून १ एकर ३३ गुंठे ज्ािमनीचा मोबदला दिला आहे. उर्वरित १ एकर २४ गुंठे जमिनीचा मोबदला दिला नाही. मोबदला दिला नसताना व संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना सिडकोने त्या जमिनीच्या सातबारावर त्यांची नावे टाकली आहेत. याशिवाय ही जमीन ऐरोली रेल्वे स्टेशन व रेल्वेमार्ग बनविण्यासाठी रेल्वे प्रशासनाला देवून टाकली आहे. रेल्वे ट्रॅक व एनएमएमटी डेपो यांच्यामध्ये असलेली ही जमीन रेल्वेने परस्पर अली नावाच्या व्यक्तीला भाडेतत्त्वावर दिली आहे. संबंधित व्यक्तीने या जमिनीवर भाजीपाला व केळीचे उत्पादन घेण्यासाठी ती संदीप चौहान याच्या कुटुंबीयाला दिली आहे. चौहान हे मूळचे उत्तरप्रदेशमधील असून त्यांनी या जमिनीवर भाजीपाला व केळीची लागवड केली आहे. सिडको, शासन व रेल्वे प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची पिळवणूक सुरू केली आहे. जमिनीचे मालक असणाऱ्या शेतकऱ्यांना संपादन केलेल्या जमिनीचा मोबदलाही दिला जात नाही. दुसरीकडे तीच जमीन परस्पर परप्रांतीयांना शेतीसाठी दिल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. शासनाने १९७० मध्ये जमीन संपादनाची कार्यवाही सुरू केल्यानंतर जमिनीचे मूळ मालक गणपत कोटकर यांचे १९७६ मध्ये निधन झाले. यानंतर त्यांचा मुलगा शालिग्राम कोटकर व इतरांनी सिडको, भूसंपादन अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांचे वयही ७१ वर्षे झाले आहे. ज्या जमिनीमध्ये भात व इतर पिके घेतली त्याच जमिनीवर परप्रांतीयांना शेती करताना पाहून दु:ख होत आहे. स्वत:च्या जमिनीचा वापर करता येत नसेल जगून काय फायदा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. माझ्या मृत्यूस शासन जबाबदारपीडित शेतकरी शालिग्राम गणपत कोटकर तीस वर्षांपासून जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी सिडको, भूसंपादन विभाग यांच्याकडे पाठपुरावा करत आहे. परंतु संबंधित यंत्रणा १ एकर २४ गुंठे जमिनीचा मोबदलाही देत नाहीत व जमीनही देत नाहीत. यामुळे त्रस्त झालेल्या कोटकर यांनी २९ आॅक्टोबर २०१३ मध्ये प्रांत व इतर कार्यालयास पत्र देवून संपादनाची प्रक्रिया झालेली नसतानाही सातबारा उताऱ्यावरून आमची नावे कमी केली आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही न्याय दिला जात नाही. यामुळे मी व माझ्या कुटुंबीयांचे मानसिक स्वास्थ्य हरवू लागले असून आमच्यापैकी कोणाचाही मृत्यू झाल्यास त्यास संबंधित शासकीय यंत्रणेला जबाबदार धरण्यात यावे असा इशारा दिला आहे. >भूमिपुत्रांच्या जखमेवर मीठरेल्वे स्टेशनला लागून असलेल्या जमिनीवर कोटकर कुटुंबीयांच्या तीन पिढ्यांनी शेती केली आहे. परंतु ती जमीनच सरकारने ताब्यात घेतली. मोबदला दिला नाहीच पण ती परस्पर परप्रांतीयांना भाजीपाल्याची शेती करण्यासाठी भाडेतत्त्वावर दिली आहे. ज्यांच्या मालकीची जमीन त्या प्रकल्पग्रस्तांना भूमिहीन करून परप्रांतीयांना शेतकरी बनविले जात आहे. तीन दशके प्रकल्पग्रस्त हक्कासाठी संघर्ष करत असताना त्यांची जमीन परप्रांतीयांना देवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात असल्याची प्रतिक्रिया कोटकर कुुटुंबीयांनी दिली आहे.