शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

आरटीई प्रवेशासाठी राज्याच्या १ हजार ८८५ शाळांकडे पालकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 06:01 IST

शून्य अर्ज आल्याने १४,२६० जागा रिक्त; आतापर्यंत २०,३५० विद्यार्थ्यांना प्रवेश

मुंबई : आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या लॉटरीत निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया गेल्या ११ दिवसांपासून सुरू आहे. २० एप्रिलपर्यंतच्या आरटीई प्रवेशाच्या अहवालानुसार आतापर्यंत राज्यात निवड झालेल्या एकूण प्रवेशांपैकी केवळ ३० टक्के प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत. आरटीईच्या पहिल्या सोडतीत राज्यातील ९,१९५ शाळांतील ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. २० एप्रिलपर्यंत त्यातील केवळ २० हजार ३५० प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे पहिल्या सोडतीतच ५० टक्के प्रवेशही अद्याप निश्चित न झाल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे पहिल्या सोडतीनंतर राज्यात शून्य अर्ज आलेल्या एकूण १,८८५ शाळा असून त्यामध्ये एकूण १४,२६० जागा आहेत. पालकांनी या शाळांकडे पाठ फिरवल्यामुळे या जागा निदान पहिल्या सोडतीसाठी रिक्त राहणार आहेत. यातील अनेक शाळांचीच नावे पालकांना माहीत नाहीत तर काही शाळा या नव्याने मान्यता मिळालेल्या असल्याने पालकांनी त्यास पसंती दिली नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशासाठी ठरावीक शाळांकडेच पालकांचा ओढा असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यातही नावाजलेल्या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश मिळावा, अशी पालकांची इच्छा असल्याचे पाहायला मिळते.दरम्यान, यंदा प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यांनुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र उत्पन्नाच्या दाखल्याचे प्रमाणपत्र नसणे, अर्ज व प्रत्यक्ष गुगल मॅपिंगमध्ये घर ते शाळा यातील अंतर नियमबाह्य असणे, जातीचे प्रमाणपत्र नसणे अशी कारणे देऊन अद्यापही समितीकडून प्रवेश नाकारले जात असल्याची माहिती मिळत आहे.प्रवेश निश्चितीत ठाणे दुसऱ्या क्रमांकावर२० एप्रिलपर्यंतच्या अहवालानुसार आतापर्यंत सर्वात जास्त ४,९८५ प्रवेश हे पुण्यात निश्चित झाले आहेत. त्यानंतर ठाणे २,५२२ तर नाशिकमध्ये १,६४९ प्रवेश निश्चित झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यात अद्याप एकही प्रवेश निश्चित झाला नसून सिंधुदुर्गमध्ये केवळ ५ आरटीई प्रवेश निश्चित झाले आहेत. मुंबई पालिकेतील शाळांमध्ये आतापर्यंत १,१२४ तर इतर माध्यमाच्या शाळांत ३९४ प्रवेश निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाEducationशिक्षण