शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

आरटीई प्रवेशासाठी राज्याच्या १ हजार ८८५ शाळांकडे पालकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 06:01 IST

शून्य अर्ज आल्याने १४,२६० जागा रिक्त; आतापर्यंत २०,३५० विद्यार्थ्यांना प्रवेश

मुंबई : आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या लॉटरीत निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया गेल्या ११ दिवसांपासून सुरू आहे. २० एप्रिलपर्यंतच्या आरटीई प्रवेशाच्या अहवालानुसार आतापर्यंत राज्यात निवड झालेल्या एकूण प्रवेशांपैकी केवळ ३० टक्के प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत. आरटीईच्या पहिल्या सोडतीत राज्यातील ९,१९५ शाळांतील ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. २० एप्रिलपर्यंत त्यातील केवळ २० हजार ३५० प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे पहिल्या सोडतीतच ५० टक्के प्रवेशही अद्याप निश्चित न झाल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे पहिल्या सोडतीनंतर राज्यात शून्य अर्ज आलेल्या एकूण १,८८५ शाळा असून त्यामध्ये एकूण १४,२६० जागा आहेत. पालकांनी या शाळांकडे पाठ फिरवल्यामुळे या जागा निदान पहिल्या सोडतीसाठी रिक्त राहणार आहेत. यातील अनेक शाळांचीच नावे पालकांना माहीत नाहीत तर काही शाळा या नव्याने मान्यता मिळालेल्या असल्याने पालकांनी त्यास पसंती दिली नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशासाठी ठरावीक शाळांकडेच पालकांचा ओढा असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यातही नावाजलेल्या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश मिळावा, अशी पालकांची इच्छा असल्याचे पाहायला मिळते.दरम्यान, यंदा प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यांनुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र उत्पन्नाच्या दाखल्याचे प्रमाणपत्र नसणे, अर्ज व प्रत्यक्ष गुगल मॅपिंगमध्ये घर ते शाळा यातील अंतर नियमबाह्य असणे, जातीचे प्रमाणपत्र नसणे अशी कारणे देऊन अद्यापही समितीकडून प्रवेश नाकारले जात असल्याची माहिती मिळत आहे.प्रवेश निश्चितीत ठाणे दुसऱ्या क्रमांकावर२० एप्रिलपर्यंतच्या अहवालानुसार आतापर्यंत सर्वात जास्त ४,९८५ प्रवेश हे पुण्यात निश्चित झाले आहेत. त्यानंतर ठाणे २,५२२ तर नाशिकमध्ये १,६४९ प्रवेश निश्चित झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यात अद्याप एकही प्रवेश निश्चित झाला नसून सिंधुदुर्गमध्ये केवळ ५ आरटीई प्रवेश निश्चित झाले आहेत. मुंबई पालिकेतील शाळांमध्ये आतापर्यंत १,१२४ तर इतर माध्यमाच्या शाळांत ३९४ प्रवेश निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाEducationशिक्षण