शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशासाठी राज्याच्या १ हजार ८८५ शाळांकडे पालकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 06:01 IST

शून्य अर्ज आल्याने १४,२६० जागा रिक्त; आतापर्यंत २०,३५० विद्यार्थ्यांना प्रवेश

मुंबई : आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या लॉटरीत निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया गेल्या ११ दिवसांपासून सुरू आहे. २० एप्रिलपर्यंतच्या आरटीई प्रवेशाच्या अहवालानुसार आतापर्यंत राज्यात निवड झालेल्या एकूण प्रवेशांपैकी केवळ ३० टक्के प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत. आरटीईच्या पहिल्या सोडतीत राज्यातील ९,१९५ शाळांतील ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. २० एप्रिलपर्यंत त्यातील केवळ २० हजार ३५० प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे पहिल्या सोडतीतच ५० टक्के प्रवेशही अद्याप निश्चित न झाल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे पहिल्या सोडतीनंतर राज्यात शून्य अर्ज आलेल्या एकूण १,८८५ शाळा असून त्यामध्ये एकूण १४,२६० जागा आहेत. पालकांनी या शाळांकडे पाठ फिरवल्यामुळे या जागा निदान पहिल्या सोडतीसाठी रिक्त राहणार आहेत. यातील अनेक शाळांचीच नावे पालकांना माहीत नाहीत तर काही शाळा या नव्याने मान्यता मिळालेल्या असल्याने पालकांनी त्यास पसंती दिली नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत मोफत प्रवेशासाठी ठरावीक शाळांकडेच पालकांचा ओढा असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यातही नावाजलेल्या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश मिळावा, अशी पालकांची इच्छा असल्याचे पाहायला मिळते.दरम्यान, यंदा प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यांनुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र उत्पन्नाच्या दाखल्याचे प्रमाणपत्र नसणे, अर्ज व प्रत्यक्ष गुगल मॅपिंगमध्ये घर ते शाळा यातील अंतर नियमबाह्य असणे, जातीचे प्रमाणपत्र नसणे अशी कारणे देऊन अद्यापही समितीकडून प्रवेश नाकारले जात असल्याची माहिती मिळत आहे.प्रवेश निश्चितीत ठाणे दुसऱ्या क्रमांकावर२० एप्रिलपर्यंतच्या अहवालानुसार आतापर्यंत सर्वात जास्त ४,९८५ प्रवेश हे पुण्यात निश्चित झाले आहेत. त्यानंतर ठाणे २,५२२ तर नाशिकमध्ये १,६४९ प्रवेश निश्चित झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यात अद्याप एकही प्रवेश निश्चित झाला नसून सिंधुदुर्गमध्ये केवळ ५ आरटीई प्रवेश निश्चित झाले आहेत. मुंबई पालिकेतील शाळांमध्ये आतापर्यंत १,१२४ तर इतर माध्यमाच्या शाळांत ३९४ प्रवेश निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाEducationशिक्षण