शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनो, आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या शाळेचे मध्यम ठरवण्याआधी या प्रश्नांची उत्तरे शोधा - डॉ. वसंत काळपांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 12:34 IST

मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी शाळांना पर्याय नसल्याचा सूर मराठी शाळा संवर्धनासाठी आयोजित करण्यात नुकत्याच आयोजित केलेल्या बैठकीत दिसून आला. माध्यम निवडताना काय विचार करावा याबाबत बालभारतीचे माजी संचालक डाॅ. वसंत काळपांडे यांनी लोकमतकडे आपले मत व्यक्त केले आहे.

मातृभाषेतून शिक्षण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक असते. आपल्या राज्यात लाखो मराठी शाळा उत्कृष्ट काम करत आहेत पण काही पालक घरात मराठी वातावरण असताना/आर्थिक परिस्थिती नसताना केवळ प्रतिष्ठेसाठी इंग्रजी शाळांची वाट धरतात. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळेचे माध्यम निवडताना व त्याच्या शाळोबाबत विचार करताना काही मुद्द्यांचा विचार करावा  म्हणून याबाबत मी तुम्हा पालकांसमोर पुढील प्रश्न ठेवत आहे .

१) केवळ प्रतिष्ठेची बाब म्हणून आपण मुलाच्या शाळेचे माध्यम ठरवत नाही ना ? 

२) शाळेची फी आणि इतर खर्च आपल्याला परवडण्या सारखा आहे का ? या खर्चामुळे अनावश्यक ताण येऊन घरातील वातावरण सतत चिंताग्रस्त तर राहात नाही ना ? ( तसं असेल तर आपल्या मुलांच्या मानसिक स्थितीवर आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही त्याचा विपरीत परिणाम होईल).

३) मुलांसाठी खेळणी, पुस्तके त्यांच्या आवडीच्या इतर वस्तू खरेदी करण्यास आपल्याकडे पैसा उरतो काय ?

४) शाळेकडून आपले आर्थिक शोषण होते अशी भावना आपल्या मनात येते का ? 

५) शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडून आपल्याला शाळेत मिळणार्या वागणुकीबद्दल आपण समाधानी असतो का ? शाळेत वावरताना आपल्याला मोकळेपणा वाटतो काय ? कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड तर वाटत नाही ना ?

६) केवळ उच्चभ्रू समाजात वावरल्यामुळे बाकीच्या समाजाबाबत तुच्छतेची भावना तर निर्माण होत नाही ना ?

७) आपली मुले शाळेत काय शिकली आहेत; त्यांना अभ्यासात काही अडचण आली तर आपण मदत करु शकतो का ?

८) आपल्या मुलांशी व त्यांच्या शिक्षकांशी आपण आत्मविश्वासाने संवाद साधू शकतो का ?

९) आपला पाल्य गणित आँलिम्पियाड, होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा आणि शाळेबाहेरील इतर संस्थांनी आयोजीत केलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होतो का ? असल्यास त्याच्या संपादणुकीबाबत आपण समाधानी आहात का ? 

१०) मुलाची शोधकवृत्ती आणि सर्जनशिलता यांना शाळेत वाव मिळतो का? 

११)आपला पाल्य इंग्रजीत स्वयंस्फुर्तीने लिहितो का ?

१२)आपली मुले विविध विषयांवरील चर्चेत सहभागी होतात का ? 

या प्रश्नांची उत्तरे आपली मुले शाळेत गेल्यावर शोधण्याचा प्रयत्न केल्यास फार उशिर झाला असण्याची शक्यता आहे. इतक मुलांचे काय अनुभव आहेत ते डोळसपणे पाहा. त्यांच्या पालकांच्या जागी स्वतःला ठेवून पाहा. आपल्या मुलाला इंग्रजी नर्सरी किंवा केजीमध्ये घातले असेल तर पुढे भविष्य कसे असेल याचा विचार करा.  या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि मुलाला कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालायचं याचा निर्णय घ्या.

(डाॅ. वसंत काळपांडे बालभारतीचे माजी संचालक आणि  राज्य मंडळ (एसएससी बोर्ड)चे माजी अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Indiaभारत