शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

पूर्व प्राथमिक ते दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाबाबत पालक संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:20 IST

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सायबर सुरक्षेचा विचार करता, शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना ऑनलाइन लर्निंग नको, अशा सूचना दिल्या.

मुंबई : पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सायबर सुरक्षेचा विचार करता, शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना ऑनलाइन लर्निंग नको, अशा सूचना दिल्या. मात्र, अनेक शाळा केवळ मार्गदर्शक सूचना म्हणून त्या धुडकावून लावत असून, त्यांनी या विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण सुरू केल्याच्या तक्रारी पालक व सामाजिक संस्थांनी केल्या. शुक्रवारी उच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण नकोच, असे निर्देश दिले. मात्र, अनेक पालकांना आॅनलाइन शिक्षण नसेल, तर त्यांची मुले शैक्षणिकदृष्ट्या मागे राहतील व त्यांचे वर्ष वाया जाईल, अशी भीती आहे. त्यामुळे त्यांच्यात संभ्रम आहे.पूर्व प्राथमिकची (शासकीय अंगणवाड्या, नर्सरी, प्ले ग्रुप्स) मुले खूपच लहान असल्याने, आॅनलाइन शिक्षणाचा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर व शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांना आहे. त्यामुळे त्यांना आॅनलाइन शिक्षण न देता सोप्या, सहज संकल्पना, खेळांतून शिक्षण द्यावे, व्हिडीओजच्या माध्यमातून संकल्पना शिकविण्याचा पालकांनी प्रयत्न करावा, अशा सूचना शिक्षण विभागाने सुचविल्या आहेत.मात्र, या विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण बंद केल्यास त्यांचे नुकसान होईल, शिवाय शिक्षण नसल्याने शाळांना पालकांकडून शुल्क येणे बंद होईल. यामुळे या वर्गातील शेकडो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होईल. आधीच लॉकडाऊनच्या काळात अनेक पालकांकडून शुल्क येणे बंद झाले आहे. अशात या शिकवण्याही बंद केल्या आणि शुल्क आले नाही, तर संस्थांना शिक्षकांचे वेतन देणे शक्य होणार नाही. परिणामी, त्यांना कमी करण्याचा निर्णय शाळा प्रशासनाला घ्यावा लागेल. अनेकांच्या नोकऱ्या अडचणीत येतील, अशी भीती शिक्षक व संस्थाचालकांना आहे. त्यामुळे अनेक खासगी, अनुदानित शाळांनी या सूचना न अवलंबता आॅनलाइन शिक्षण घेण्याचे ठरविले आहे.मात्र, शालेय संस्था आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य यांच्यामध्ये अडकलेल्या पालकांना आता काय करावे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे अनेक पालक आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारत असल्याचे चित्र आहे.>‘इयत्ता दुसरीपर्यंत कोणत्याही शिक्षण मंडळाला ई लर्निंगची परवानगी नाही’इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यास मनाई करणारे परिपत्रक संपूर्ण राज्याला आणि सर्व शिक्षण मंडळांना लागू होते, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिली.मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. के. के. तातेड यांच्या खंडपीठापुढे एका एनजीओने पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक विद्यार्थ्यांची आॅनलाईन किंवा आॅफलाईन शाळा सप्टेंबरपर्यंत सुरू न करण्याची मागणी करणाºया जनहित याचिकेवर सुनावणी होती.महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले की, राज्य सरकारच्या १५ जूनच्या परिपत्रकामध्ये या मुद्द्याविषयी स्पष्ट निर्देश दिले आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडला आहे. राज्य सरकारचे हे परिपत्रक विचारात घेऊन न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.