शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

विधानसभा निवडणुकीत गाजतायत 'पार्सल' लढती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 16:32 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांना बारामतीचे पार्सल म्हणून हिनवले. तसेच भाजप उमेदवार राम शिंदे यांना निवडून देऊन बारामतीचं पार्सल परत पाठवून द्या, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले होते.

- रवींद्र देशमुख

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच जोर चढला आहे. तसाच जोर आता टीका टिप्पणी करण्यावरही वाढला आहे. प्राण्यांची उपाधी झाल्यानंतर आता वैयक्तीक टीका करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचवेळी मतदार संघ नसलेल्या पण जनतेतून निवडून येण्याची इच्छा बाळगून बाहेरच्या मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या नेत्यांवरही टीका होताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर हे बाहेरच पार्सल परत पाठवून द्या, असा सल्ला मतदारांना नेते मंडळीकडून देण्यात येत आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू रोहित पवार उभे असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातून पार्सल या टीकेला सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांना बारामतीचे पार्सल म्हणून हिनवले. तसेच भाजप उमेदवार राम शिंदे यांना निवडून देऊन बारामतीचं पार्सल परत पाठवून द्या, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले होते. मात्र या मतदारसंघातून रोहित पवारांना मिळणारा पाठिंबा पाहता, पार्सल या शब्दामुळे त्यांच नुकसान होईल, असं चित्र सध्या तरी दिसत नाही.

कर्जत-जमाखेड व्यतिरिक्त बाहेरच पार्सल म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चांगलेच ट्रोल होत आहे. मुळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूड मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. कोथरूडमधील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आले आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये पार्सल लढत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांच्यावर होत आहे. परंतु, कोथरूड मतदार संघावर भाजपची पकड मजबूत असून पार्सलचा मुद्दा पाटील यांच्यासाठी फारसा महत्त्वाचा ठरणार नाही,  अशी शक्यता आहे.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदार संघातील लढत देखील पार्सल लढत म्हणून गाजत आहे. घनसावंगी मतदार संघातून शिवसेनेकडून हिकमत उढाण तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश टोपे निवडणूक लढवत आहेत. उढाण हे अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास होते. मात्र मागील पाच वर्षांपासून ते मतदार संघात सक्रिय झाले आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र आता राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर मुंबईचं पार्सल अशी टीका करण्यात येते. परंतु, उढाण यांनी देखील आपण इथलच पार्सल असून येथेच राहणार अशल्याचे म्हटले आहे.