शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

विधानसभा निवडणुकीत गाजतायत 'पार्सल' लढती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 16:32 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांना बारामतीचे पार्सल म्हणून हिनवले. तसेच भाजप उमेदवार राम शिंदे यांना निवडून देऊन बारामतीचं पार्सल परत पाठवून द्या, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले होते.

- रवींद्र देशमुख

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच जोर चढला आहे. तसाच जोर आता टीका टिप्पणी करण्यावरही वाढला आहे. प्राण्यांची उपाधी झाल्यानंतर आता वैयक्तीक टीका करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचवेळी मतदार संघ नसलेल्या पण जनतेतून निवडून येण्याची इच्छा बाळगून बाहेरच्या मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या नेत्यांवरही टीका होताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर हे बाहेरच पार्सल परत पाठवून द्या, असा सल्ला मतदारांना नेते मंडळीकडून देण्यात येत आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू रोहित पवार उभे असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातून पार्सल या टीकेला सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांना बारामतीचे पार्सल म्हणून हिनवले. तसेच भाजप उमेदवार राम शिंदे यांना निवडून देऊन बारामतीचं पार्सल परत पाठवून द्या, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले होते. मात्र या मतदारसंघातून रोहित पवारांना मिळणारा पाठिंबा पाहता, पार्सल या शब्दामुळे त्यांच नुकसान होईल, असं चित्र सध्या तरी दिसत नाही.

कर्जत-जमाखेड व्यतिरिक्त बाहेरच पार्सल म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चांगलेच ट्रोल होत आहे. मुळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूड मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. कोथरूडमधील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आले आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये पार्सल लढत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांच्यावर होत आहे. परंतु, कोथरूड मतदार संघावर भाजपची पकड मजबूत असून पार्सलचा मुद्दा पाटील यांच्यासाठी फारसा महत्त्वाचा ठरणार नाही,  अशी शक्यता आहे.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदार संघातील लढत देखील पार्सल लढत म्हणून गाजत आहे. घनसावंगी मतदार संघातून शिवसेनेकडून हिकमत उढाण तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश टोपे निवडणूक लढवत आहेत. उढाण हे अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास होते. मात्र मागील पाच वर्षांपासून ते मतदार संघात सक्रिय झाले आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. मात्र आता राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर मुंबईचं पार्सल अशी टीका करण्यात येते. परंतु, उढाण यांनी देखील आपण इथलच पार्सल असून येथेच राहणार अशल्याचे म्हटले आहे.